शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

DATE: 29-10-16: FROM POOLCHAND M SONAWANE:

*🍁 निरोगधाम पत्रिका 🍁*
🙏🏻जीवनोपयोगी🙏🏻

1. *सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?*
उत्तर. - थोड़े हल्के गरम पाणी.

2. *पिण्याचे पाणी कसे प्यावे?*
उत्तर. - घोट-घोट व खाली बसून प्यावे.

3. *जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?*
उत्तर. - 32 वेळा.

4. *पोट भरून जेवण केव्हा करावे?*
उत्तर. - सकाळी.

5. *सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?*
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.

6. *सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - ज्यूस

7. *दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - लस्सी किंवा ताक.

8. *रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - दूध

9. *आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?*
उत्तर. - रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.

10. *आईसक्रीम केव्हा खावी?*
उत्तर. - कधीही नाही.

11. *फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?*
उत्तर. - 1 तासानंतर

12. *शीतपेय प्यावे का?*
उत्तर. - अजिबात नाही.

13. *तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?*
उत्तर. - 40 मिनिटांंत

14. *दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?*
उत्तर. - थोड़ी भूक असू द्यावी.

15. *रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?*
उत्तर. - सूर्य मावळण्या आधी

16. *जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?*
उत्तर. - 48 मिनिटे अगोदर

17. *काय रात्री लस्सी पिऊ शकतो?*
उत्तर. - नाही

18. *सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - काम

19. *दुपारच्या जेवनानंतर काय करावे?*
उत्तर. - विश्रांती

20. *रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.

21. *जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?*
उत्तर. - वज्रासन

22. *जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?*
उत्तर. - 5 -10 मिनिटे

23. *सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?*
उत्तर. - तोंडाची लाळ

24. *रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे?*
उत्तर. - 9 - 10 वाजे पर्यन्त

25. *तीन विष कोणते?*
उत्तर.- साखर , मैदा व मीठ.

26. *जेवण किती प्रमाणात असावे?*
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.

27. *रात्री सलाड खावे का?*
उत्तर. - नाही.

28. *जेवण नेहमी कसे करावे?*
उत्तर. - खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.

29. *विदेशी पदार्थ खरेदी कराव का?*
उत्तर. - कधीच खरेदी करू नये.

30. *चहा केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कधीच नाही.

31. *दुधात नेहमी काय टाकून प्यावे?*
उत्तर. - हळद

32. *दूधात हळद टाकून का प्यावे?*
उत्तर. - कैंसर न होण्यासाठी

33. *कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?*
उत्तर. - आयुर्वेद

34. *सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते?*
उत्तर. - ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)

35. *तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते?*
उत्तर. - जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

36. *माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - मार्च ते जून (उन्हाळ्यात)

37. *सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कमीत कमी 2 - 3 ग्लास

38. *पहाटे केव्हा उठावे?*
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.

ह्या आरोग्य टिप्स आपल्यासाठी बहुमूल्य आहेत.जास्तीत जास्त ह्या टिप्सचा वापर करुन आपले आरोग्य सुदृढ़ करा.🙏🏼
DATE: 29-10-16: FROM POOLCHAND M SONAWANE:

*🍁 निरोगधाम पत्रिका 🍁*
🙏🏻जीवनोपयोगी🙏🏻

1. *सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?*
उत्तर. - थोड़े हल्के गरम पाणी.

2. *पिण्याचे पाणी कसे प्यावे?*
उत्तर. - घोट-घोट व खाली बसून प्यावे.

3. *जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?*
उत्तर. - 32 वेळा.

4. *पोट भरून जेवण केव्हा करावे?*
उत्तर. - सकाळी.

5. *सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?*
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.

6. *सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - ज्यूस

7. *दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - लस्सी किंवा ताक.

8. *रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - दूध

9. *आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?*
उत्तर. - रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.

10. *आईसक्रीम केव्हा खावी?*
उत्तर. - कधीही नाही.

11. *फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?*
उत्तर. - 1 तासानंतर

12. *शीतपेय प्यावे का?*
उत्तर. - अजिबात नाही.

13. *तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?*
उत्तर. - 40 मिनिटांंत

14. *दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?*
उत्तर. - थोड़ी भूक असू द्यावी.

15. *रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?*
उत्तर. - सूर्य मावळण्या आधी

16. *जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?*
उत्तर. - 48 मिनिटे अगोदर

17. *काय रात्री लस्सी पिऊ शकतो?*
उत्तर. - नाही

18. *सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - काम

19. *दुपारच्या जेवनानंतर काय करावे?*
उत्तर. - विश्रांती

20. *रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.

21. *जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?*
उत्तर. - वज्रासन

22. *जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?*
उत्तर. - 5 -10 मिनिटे

23. *सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?*
उत्तर. - तोंडाची लाळ

24. *रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे?*
उत्तर. - 9 - 10 वाजे पर्यन्त

25. *तीन विष कोणते?*
उत्तर.- साखर , मैदा व मीठ.

26. *जेवण किती प्रमाणात असावे?*
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.

27. *रात्री सलाड खावे का?*
उत्तर. - नाही.

28. *जेवण नेहमी कसे करावे?*
उत्तर. - खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.

29. *विदेशी पदार्थ खरेदी कराव का?*
उत्तर. - कधीच खरेदी करू नये.

30. *चहा केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कधीच नाही.

31. *दुधात नेहमी काय टाकून प्यावे?*
उत्तर. - हळद

32. *दूधात हळद टाकून का प्यावे?*
उत्तर. - कैंसर न होण्यासाठी

33. *कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?*
उत्तर. - आयुर्वेद

34. *सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते?*
उत्तर. - ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)

35. *तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते?*
उत्तर. - जून ते सप्टेंबर (पावसाळयात)

36. *माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - मार्च ते जून (उन्हाळ्यात)

37. *सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कमीत कमी 2 - 3 ग्लास

38. *पहाटे केव्हा उठावे?*
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.

ह्या आरोग्य टिप्स आपल्यासाठी बहुमूल्य आहेत.जास्तीत जास्त ह्या टिप्सचा वापर करुन आपले आरोग्य सुदृढ़ करा.🙏🏼
DATE: 29-10-16: FROM ACHUT R BHOITE, POWAI, MUMBAI:

Supreme Court of India civil appeal no. 4870 -2015 . Decided on 29 April 2016 . Mohammad Sadique v/s Darbara Singh Guru . Honourable justice Ranjan Gogoi & Prafulla c. Pant . Important points :- 

What "caste" actually means ? 

Caste : Caste is a largely static exclusive social class, membership in which is determined by birth and involves particular customary restrictions and privileges. 

Dictionary meaning : "Caste" in relation to Hinduism means any of the four social divisions namely... 
1 ) Brahmin ( priests ) 
2 ) Khshatriya ( warriors) 
3 ) Vaishya ( agriculturists &         traders ) 
4 ) Shudras ( servants ) ----------------------------What "Scheduled Caste" means ? 

Constitution Bench of Supreme Court explained meaning given it by clause (24) of article 366 and it means - 
"such caste's, races or tribes or parts of or groups within such casts, races or tribes as are deemed under Article 341 to be Scheduled castes for the purposes of constitution. " 
One of the castes specified there in Articale 341 is must. But by reason of clause (3), It is not necessary that he should have been a Hindu or Sikh... 

Scheduled caste person converting into other religion still retains his scheduled caste status. 

Scheduled caste person adjures his old religion and converted to a new one, there is no loss of caste. 

Scheduled caste person profess any religion carry his caste along with him. 

It is not essential for anyone to change name after embracing a different faith . 

But, Scheduled caste person has to prove that he belonged to Scheduled caste community. It is settled Law that a person can change his religion and faith but not caste, to which he belongs, as caste has linkage to birth. 

अब हमें क्या करना चाहिए ? 
जहाँ पर भी धर्म लिखना आवश्यक है, धर्म के साथ शेड्यूल मे अंतर्भुत ज़ाति लिखना होगा ।

जैसे : 

हिन्दू - महार, चमार आदि लिखते थे, 
बौद्ध - महार,चमार आदि लिखना है। 

BUDDHIST-SCHEDULED CASTE 

अच्युत भोईटे : बी कॉम एम बी ए संयोजक : दि बुद्धिस्ट - शेड्यूल कास्ट मिशन ऑफ़ इन्डिया मो . 9870580728 .

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

दिनांक: 22-10-16: श्री. विलास नामदेवराव व्हटकर, गोरेगाव, मुंबई यांचे कडून: मागेल त्याला व्यवसायिक प्रशिक्षण - अनुसुचित जातीसाठी: लिंक: https://mahaschemes.maharashtra.gov.in/mr/education-and-training-scheme.html

मागेल त्याला व्यवसायिक प्रशिक्षण - अनुसुचित जातीसाठी

अ.क्र.योजनासविस्तर माहिती
१-योजनेचे नाव :मागेल त्याला व्यावसायिक प्रशिक्षणयोजनेची माहिती :
२-योजने बद्दलचा शासन निर्णय :शा.नि. क्र.इबीसी २००३/प्र.क्र.१८८/मावक-२ दिनांक- ४ जुलै २००३ अन्वये
३-योजनेचा प्रकार :राज्य
४-योजनेचा उद्देश :अनुसुचित जातीमधील बेरोजगार उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण देवुन त्यांना स्वयंरोजगार मिळवुन देणे.
५-योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव :अनुसुचित जाती
६-योजनेच्या प्रमुख अटी :विद्यार्थी अनु.जाती व नवबौध्द घटकांतील असावा. किमान ४ थी पास असावा.
७-आवश्यक कागदपत्रे :
८-दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये मोफत प्रशिक्षण. प्रशिक्षणार्थ्यास टुल किट आणि रु.१००/- दरमहा विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण कालावधी १ आठवडा ते २ महिने.
९-अर्ज करण्याची पद्धत :संबंधित प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था
१०-अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ :
११-संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता :संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण संबंधित आय.टी.आय चे प्राचार्य.
१२-Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: -
दिनांक: 22-10-16: श्री. विलास नामदेवराव व्हटकर, गोरेगाव, मुंबई यांचे कडून: कौशल्य विकास व उद्योजकता विभाग: लिंक:
https://mahaschemes.maharashtra.gov.in/mr/skill%20development%20department.html

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

DATE: 21-10-16: FROM MR RAMAKANT S NARAYANE, NAVI MUMBAI:

कक्कय्या समाज बांधवहो,

नुकताच पनवेल येथे  कक्कय्या  समाज्याचा वधू - वर मेळावा पार पडला. मीही सदर मेळाव्यास हजर होतो. सदर मेळाव्यामध्ये माहिती देण्यासाठी भावी वधू - वर व्यासपीठावर येत नव्हते.मोठ्या संख्येने समाज हजर असल्यामुळे सर्वांना हॉलमध्ये जागाही उपलब्ध नव्हती.तसेच मागील बाजूस व्यासपीठावरील वक्त्यांचा आवाजही ऐकू येत नव्हता. साधारण वधू - वरांकडील मंडळी वधू - वरांना बायोडेटा व फोन मागत असताना दिसत होते. वधू - वरांची माहिती असलेले पुस्तक, नाव नोंदवलेल्या मंडळींना साधारण दोन महिन्यांनी मिळेल. ते पाहून  वधू - वरांकडील मंडळी निर्णय घेतील. लांबचे स्थळ  पाहण्यास वेळ व पैसाही खर्च होतो. त्यामुळे मला विनंतीपूर्वक काही सूचना कक्कय्या समाज्यातील वधू -वर मंडळाचे पदाधिकारी यांना कराव्यात असे वाटले. त्या मी खाली देत आहे. 

१) वधू - वरांची नावे नोंदणी ई -मेल द्वारे आधीच करून ठेवावी. 
२) सर्व  उपस्थित वधू - वरांना पुढील तीन - चार रांगेत बसवावे. 
३) सर्व वधू - वरांचे चार स्लाईडचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) आधीच  तयार करून ते चार ते पाच स्क्रीनवर दाखवावेत. 
- पहिल्या स्लाईडवर वधू - वरांचे पूर्ण आकाराचे  दोन फोटो असावेत. 
- दुसऱ्या  स्लाईडवर बाओ-डेटा असावा. 
- तिसऱ्या स्लाईडवर फॅमिली फोटो असावा. 
- चौथ्या स्लाईडवर मुलाच्या / मुलीच्या अपेक्षा असाव्यात. 
४) प्रत्येक स्लाईडवर नाव व संपर्क मोबाईल नंबर द्यावा. 
५) नाव पुकारल्यावर वधू - वरांनी पुढे येऊन PPT च्या माध्यमातून आपली माहिती द्यावी. वधू / वर पुढे न आल्यास निवेदकाने ती माहिती वाचावी. व त्यावेळेस वधू / वराने व्यासपीठाजवळ येऊन उभे रहावे. 
६) वधू - वरांना व त्यांच्या पालकांना मंडळाकडे सर्व नावे नोंदविलेल्या वधू - वरांची थोडक्यात असलेली Excel मधील यादी नाव, संपर्क क्रमांक, जन्म दि., वय, शिक्षण, उत्पन्न, अपेक्षा  इ. सह द्यावी. 
७) वधू - वरांनी व त्यांच्या पालकांनी  PPT, वधू /वर यांना पाहून त्यांच्या अपेक्षेत बसणाऱ्या  वधू / वर यांच्या नावापुढे यादीवर खूण करुन ठेवावी. जमल्यास तेथेच मोबाईलवर .वर संपर्क करावा. 

मेळावा वधू - वरांसाठी असतो व त्यासाठी वधू - वर व त्यांचे पालक लांबून स्वखर्चाने आलेले असतात. समाज्याने त्यासाठी निधी दिलेला असतो. त्यामुळे पूर्ण वेळ वधू - वरांसाठी द्यावा. हार-तुरे, सत्कार, भाषणे हा कार्यक्रम थोडक्यात संपवावा. जास्तीत ज्यास्त वेळ वधू - वर संपर्कासाठी मिळेल अश्या प्रकारे मेळाव्याचे नियोजन असावे. मेळाव्यासाठी हॉल निवडतानाही सर्व बाबींचा व सोयीचा  विचार व्हावा. उपस्थितांनी कार्यक्रम सुरु असताना शांतता पाळावी.  समाज्यातील चालू घडामोडींचे चार पानी  पत्रकही उपस्थितांना देण्यात यावे. 

आपला समाज बंधू,

रमाकांत नारायणे 
Dt.21.10.16
DATE: 21-10-16: FROM MR VILAS J BORADE, DADAR, MUMBAI:

 🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
🌎   "बिल गेट" चे भारतीय   🌎
🌎      लोकांविषयी मत...    🌎
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
         सर्वांनी हे नक्की वाचा
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

तो म्हणतो,
"भारत हा जगात
सगळ्यात श्रीमंत देश आहे.
या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी "भारत हा महासत्ता होऊ शकतो,
परंतु ,
मजेची गोष्ट ही आहे की, या देशातील
लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून,
शेतकरी देवाला
दोष देत आत्महत्या करतो...।
कारण ,
त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण
आहे हेच त्याला कळत नाही ...।

या देशातील गरीब जनतेला कळत
नाही की तुमच्या गरिबीला कोण जबाबदार आहे ?

इथल्या तरुणाला
कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे...?

भयाण वास्तव...

१) इथल्या तरुणाला गुलामी कळू नये
म्हणून, क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदीरे, यांची अफूची गोळी दिलेली असते तो त्यामध्येच गुंग झालेला असतो...
तसेच,
पायी, वारी, सण, उत्सव यांच्या नादी
लावले जाते....।

मग, ताण (Tension)  आला की दारूचे दुकान जवळ असते....

करतो जीवन बरबाद...,
मग, स्वतःला दोष देतो ...

२) इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून...
भांडणे लावणाऱ्या मालिका,
तसेच उपास- तापास, व्रत-वैकल्ये....
यांमध्ये त्या गुंग
असतात ...

मग त्यांचे कुटुंब आणि
त्या...

त्यांना मग कोण सहन होत नाही ...(सासू, सासरे)

३) इथले नोकरी असणारे पुरुष असतात...

ते घाण्याला लावलेल्या
बैलासारखे राब-राब राबत असतात...

बँकेने दिलेले हफ्ते फेडण्यासाठी....

त्यालाच कळत नसते तो काय करतो ...
कारण, पगार जरी एक
लाख असला तरी ८०,००० हफ्ते
फेडण्यासाठी घालवत असतो ....।

एका बँकेचे कर्ज फेडले की मग, बायको दुसरे (मोठे घर) कर्ज
काढायला सांगते...

काम एवढे असते
की तो डोके वर काढू शकत नाही...

4) जेष्ट नागरिक ...
नोकरी करून शेवटी कुणीही त्याचे ऐकत नाही ...।

आश्रमाची वाट बघत असतो...

आणि,
जे लोकं जागरूक आहेत त्यांना...
अंधश्रद्धा निर्मुलन समिती, भ्रष्टाचार निर्मुलन समिती..

अनेक NGO मार्फत ..
वेगवेगळ्या पक्षाद्वारे गुंतून ठेवले जाते ...

मग कसा बदल होणार...?
कोण करणार...?

आता बाकी आहेत
त्यांनी विचार करावा...

🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
🌎   "बिल गेट" चे भारतीय   🌎
🌎      लोकांविषयी मत...    🌎
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
         सर्वांनी हे नक्की वाचा
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

DATE: 15-10-16: FROM ADV SHRIGANESH SALBA SAWALKAR, TULJAPUR:

 👏🏻👏🏻अाता शेतकरी समाजाने बदललेच पाहिजे🌷🌷🐄🐃🐏🐬🐓🐠🐟🌲🌳🌻🌴🌱
____________________
1-अाहे ती मंदिरे पुष्कळ अाहेत.नवीन मंदिरं उभारणी बंद करा.वर्गणी देऊ नका. किती मंदिरात तुमच्या मुलांना पुजा-याची नोकरी लागली. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटूंबाच्या अारोग्यावर, गुंतवणूकीवर करा.

2-दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्ती नादात व्यक्ती प्रगतीचे (वेळ नि पैसा) चक्रच मारून टाकतो. पैसा व बुध्दीचा अपव्यय होतो. कर्मातच देव अाहे यावर विश्र्वास ठेवा.(भक्त पुंडलिक)

3-'माणूस सोबत काहीच घेउन जात नाही'. हे सांगण्यासाठी बुवा २०,०००रू. घेतो. या बाबांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, अाराेग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे अायोजन करा.

4-शेतीतील, कुटूंबातील, गावकूसातील वाद समापोचाराने मिटवा. काेर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

5-कुटूंबातील सदस्यावर सर्वात जास्त प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दू:खात तेच तुमची  जास्त काळजी घेणारे अाहेत.

6-शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्याेग-व्यवसायाकडे वळा. आणि एकमेकानां व्यवसायाठी शक्य तेवढी मदत करा.

7-अापण  सर्व जाती-धर्मांचा अादर करा. जातीवादाच पाप अापण तरी करू नका.

8-मोडेल पण वाकणार नाही. या स्वभावात बदल करा. काळ खूप बदललाय याचे भान असू द्या.(महापुरे मोठी झाडे जाती, लव्हाळे वाचती)

9-राजकारण व राजकारणी यांचा नाद सोडा. या दोहोंमुळे समाजाचे खूप मोठ नूकसान झालेय. अाता बदला म्हणजे पुढच्या अनेक पिढ्याचं कल्याण होईल. यांचा फक्त मत "दान" पुरताच विचार करा.

10-कमीत कमी गावात अाणि जास्त वेळ शेतात राहा. किमान ८ तास काम कराच (कुठल्याही क्षेत्रात)

11-खेकडा वृत्ती सोडून समाजातील इतरानां मदत करा(एकमेका साह्य करा)

12-नियोजन व काटकसरीने(अाहे त्या उत्पन्नात) जीवन जगा. भोगवादाच्या नादात कर्जबाजारी होऊच नका.

13-यात्रा जत्रा सत्यनारायण वास्तुशांती जागरणगोंधळ डोहाळे(अोटीभरण) पाचवी बारावी वाढदिवस मर्यादीतच ठेवा.

14-भांडकुदळ लबाड पैसे बुडवणाऱ्याच्या पासुन लांब रहा. मदत करणाराचे कायमच ऋणी रहा.

15-घरातील महीलांना मानाची  वागणूक द्या. मुलींना उच्च शिक्षित करा.

16-महिलांना मंदिरं, उपासना, कर्मकांड यातून बाहेर काढा अाणि व्यख्यान,उद्बोधन वर्गाला न्या. त्यांच्या हातातील पोथ्या-पुराणांची संख्या कमी करा व इतिहास,विज्ञानाची पुस्तक हातात द्या.

17-कर्मकांड करणे टाळा.  त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.

18-आपण कमविलेल्या पैश्यातुन आपल्या कुटुंबाला खुप खुश ठेवा.

मानवजन्म पुन्हा नाही
____________________
👏🏻👏🏻💐💐💐💐👏🏻👏🏻

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६


DATE: 13-10-16: FROM MR JAGDISH M JADHAV, BANGALORE:

*साथ कोणी दिली तर जात पाहू* *नका*,
*आणि*
*हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका*,
*जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते*. *पण*..... *गती* *मिळवायची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते*.
    🌅 *चिंता* *केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत* *नाही,*
*पण त्यावर "चिंतन" केल्याने चांगला मार्ग सापडतो....*
*कोणी "कौतुक" करो वा "टिका"....*
*लाभ तुमचाच आहे .....*
*कारण..... कौतुक "प्रेरणा" देते,*
*तर टिका "सुधारण्याची" संधी...!!!*

🌅 *माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी  अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टहास आपल्या त्रासाला, *वैतागाला कारणीभूत ठरत असतो.* *अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांना सतत टोमणे मारणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांच्या सतत चुका काढणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍याच्या संपत्तीची अभिलाषा  ठेवणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍याची कागाळी करणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांच्या दुःखात आपल सुख मानणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्यात  डोकावणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांशी स्वतःची तुलना करत राहणे.*

☄ *सोडून द्या :*
*दुसर्‍यांशी सतत स्पर्धा करत राहणे.*

☄ *साडून द्या :*
*दुसऱ्या ची फालतू चौकशी करणे.*

☄ *सोडून द्या :* 
*दुसऱ्याला कमी लेखन स्वतःला श्रेष्ठ समजणे.*

☄ *सोडून द्या :*
*तुमचा खोटा अहंकार*

☄ *सोडून द्या :*
*स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्या ला दुःखी करणे.*

☄ *सोडून द्या :*
*एखाद्या व्यक्तील तोंडवर न बोलता त्या व्यक्ती बद्दल मागे दुसरया व्यक्ती जवळ टीका टिप्पणी करणे, माप काढणे, मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे, माझ्या सारखा दुसरा कोणी नाही हे दाखवणे.*

☄ *सोडून द्या:*
*सगळ्या मित्र परिवारा मधे मीच हुशार आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो, लोकाना कमी लेखणे.*

👉 *लक्षात ठेवा.*
*आपण आपल्या लबाडी,स्वाथीॅ स्वभावाने लोकाना एक दोन वेळा वेड्यात काढू शकतो, पण एकदा लोकाना समजले की लोक आपल्या पासून दूर होवू लागतात.*

🌅 *तुम्ही जे दुसऱ्यांला देता तेच परत तुम्हाला मिळते. चांगलं द्या चांगल मिळेल. वाईट दिले तर आज न उद्या वाईट मिळेलच.*

🌅 *एक कुंभार मातीची चिलीम बनवित होता. चिलीमचा आकार सुध्दा केला होता ! पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला !*

*मातीने विचारले, "अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला?"*

*कुंभार म्हणाला, "मी चिलीम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला !"*

*माती म्हणाली, "कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवन बदलले ! मी चिलीम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल !"*

*तात्पर्य :* *जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो !*

🌅 *कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा..*

*राजाला त्याची प्रजा मानते,*
*पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते..!*

🎯 *पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते.*🎯
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
         🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

DATE: 12-10-16: FROM ASHOK D VHATKAR, PUNE:

*आज १२ ऑक्टोबर*
*आज चौफेर काव्यलेखनाने रसिकांना आनंद देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री मा.शांता शेळके यांची जयंती*
जन्म :- १२ ऑक्टोबर १९२२
पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मा.शांता शेळके यांनी पुढील शिक्षण घेतले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले.
मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर मा.शांताबार्इंचं प्रभुत्व होतं. वाङ्मयाचे सगळेच प्रकार जरी त्यांनी हाताळले असले तरी गीतकार म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रीत करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून होते. विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं. गाण्यातलं मराठीपण त्यातल्या सुगंधासह जपण्यासाठी अस्सल ग्रामीण शब्द गाण्यात घालताना त्यांची प्रतिभा कचरली नाही. सखे, सये अशा संबोधनातून ते घरच वाहू लागयतं. उनाड मनाच्या अवखळ प्रियकराचा अल्लडपणा, त्याचं प्रेयसीला चिडवणं हे सगळं त्या मोठ्या मिश्कीलपणे कवितेत व्यक्त करत. त्यांनी अनेक गीतांतून स्त्रीमनाच्या छटा त्यातील स्वाभाविकतेसह व्यक्त केलेल्या आहेत. प्रियकराच्या मनातील विरह, प्रीती, धैर्य, बेछूटपणा यांचाही प्रत्यय देणारी त्यांची अनेक गाणी आहेत. कोणत्या तरी दाहक वेदनेचा चटका बसून संपूर्ण आयुष्यालाच एक रिक्तता यावी, अशी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. शांताबार्इंची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत. ‘नवयुग’मध्ये नोकरी करत असताना प्र.के अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली.
कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन शांता शेळके केलेल्या वृतपत्र, संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात.
जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. मा.शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या. मा.शांता शेळकेंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या गीतांतून व्यक्त केल्यात. शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. आळंदी इथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला होता. *मा.शांता शेळके* यांचे ६ जून २००२ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे *मा.शांता शेळके* यांना आदरांजली.
*संजीव वेलणकर पुणे.*
*९४२२३०१७३३*
संदर्भ :- marathiworld.com
DATE: 12-10-16: FROM MR ANIL UKHARDU KAKDE, KALYAN:

चर्मकार समाजातील बंधू , भगिनी आणि मातांनो,
*समाज बांधवांनी नविन व्यवसाय सुरू करावा आणि ज्यांचा सध्या व्यवसाय सुरू आहे त्यांचा व्यवसाय वाढवावा याकरिता मदत व्हावी* म्हणून मी *WhatsApp* वर उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे .
ह्या उपक्रमात *दोन GROUP* असणार आहेत.
१] चर्मकार समाजातील ज्यांना *नविन व्यवसाय* सुरु करायचा आहे.
२] चर्मकार समाजातील ज्यांना *सध्या सुरु असलेला व्यवसाय* वाढवायचा आहे.
*अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे असतील*
१] *GROUP मध्ये Add झाल्यानंतर आपण समाजाच्या कोणत्याही संघटनेत असला तरी GROUP मध्ये संघटनेचे किंवा नेत्याचे उदोउदो करणाऱ्या कोणत्याही पोस्ट टाकायच्या नाहीत*.
२] GROUP मध्ये व्यापार हाच आपला *धर्म* आणि व्यापारी हीच आपली *जात* असणार आहे हे लक्षात ठेवावे
३] *GROUP मध्ये कोणतेही फोटो, कविता, जोक्स ,कथा , VDO,Good Morning, Good Night, आणि मी वेळोवेळी सांगेल तसे कोणतेही Message टाकायचे नाही*.
४] GROUP मध्ये ज्या दिवशी *जो विषय घेण्यात येईल त्याच विषयावर चर्चा करायची आणि प्रश्न विचारायचे*. विषय सोडला तर एकदाच सूचना करण्यात येईल .नंतर मात्र GROUP मधून *Remove* केले जाईल.
५] नियमांचा भंग केल्यास GROUP मधून Remove केले जाईल आणि नंतर कितीही विनंती केली किंवा माफी मागितली तरी GROUP मध्ये पुन्हा समाविष्ट केले जाणार नाही.
६] *GROUP मध्ये आपल्याच माता भगिनी आहेत याची जाणीव ठेवावी*
७] GROUP चे *काम सुरु झाल्यानंतर मध्येच कुणाचेही नाव GROUP मध्ये समाविष्ट करण्यासाठी सुचवायचे नाही*. कारण त्याला अर्धेच ज्ञान मिळेल आणि ते त्याच्या काहीही उपयोगाचे नसणार आहे. *नावच सुचवायचेच असेल तर GROUP सुरु होण्याआधीच सुचवा*
>>>>>> *महत्वाचे* <<<<<<
१] ज्यांना *नविन व्यवसाय सुरु करायचा* आहे अशा बंधू भगिनींनी आपले नाव शहर किंवा गावाचे नाव लिहिल्यानंतर  *NEW*'असे लिहून माझ्या 9324552963 ह्या WhatsApp नंबरवरिल ""वैयक्तिक Account"" वर पोस्ट करावे
२] ज्यांना सध्या सुरु असलेला *व्यवसाय वाढवायचा आहे* अशा बंधू भगिनींनी आपले नाव शहर किंवा गावाचे नाव लिहिल्यानंतर  *OLD* असे लिहून माझ्या 9324552963 ह्या WhatsApp नंबरवरिल ""वैयक्तिक Account"" वर पोस्ट करावे
३] *लक्षात ठेवा* माझ्या *9324552963* ह्या WhatsApp नंबरवरिल *वैयक्तिक Account* वर पोस्ट करायचे आहे *GROUP मध्ये* अजिबात नाही
पैशांची अडचण भासली कोणताही नेताच नव्हे तर नातेवाईक देखिल मदत करण्यास पुढे येत नाही. अशावेळी एखादयाकडे उसने पैसे मागतांना जी अवस्था होते तिला लाचारी असे म्हणतात. *लाचारी हि मृत्यू पेक्षाही वाईट असते* तुमच्या लाचारीचा पैसे उसने देणारा पण *गैरफायदा* घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैसे उसने मागणारी जर माता भगिनी असेल तर  *बऱ्याच जणांच्या  वासनेने*
*बरबटलेल्या*  नजरा  तर *किळसवाण्या* ठरतात.
                  म्हणून *समाजातील बंधू भगिनींनो स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा* म्हणजे कोणत्याही *नेत्यांचे किंवा नातेवाईकाचे उंबरठे* झिजवण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. यासाठी *स्वतःचे व्यवसाय सुरू करा आणि ज्याचे सध्या व्यवसाय सुरू असतील त्यांनी व्यवसाय कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा*
लक्षात ठेवा तुमच्या खिशात खुळखुळणाऱ्या केवळ पैशांमुळे जग तुम्हाला *सलाम* करिल. कुणासमोरही *लाचार* होण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. *स्वाभिमानाने* जगाल.
*चला तर मग व्यवसाय करू या,*            *श्रीमंत होऊ या*,
            *लाचारीला लाथ मारून स्वाभिमानाने जगू या*
जय रोहिदास जय रविदास
*अनिल काकडे.कल्याण*
*[ 9324552963 ]*
कृपया हि पोस्ट चर्मकार समाजातील सर्व बंधू, भगिनी आणि मातांना *FORWARD* करावी हि नम्र विनंती

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

DATE: 07-10-16: FROM MR GANESH A SONAVANE, KANDIVALI, MUMBAI:

मराठा आरक्षण : मा. न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची मुलाखत जशीच्या तशी

प्रश्न : मराठा समाजाचे जे मोर्चे निघताना बघतो आहोत, तर अनेक प्रश्न आहेत, मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचे. जसे आम्हाला आरक्षण द्या, ही जी मागणी होतेय, तर एकूण घटनेमध्ये जी तरतूद आहे, ती पाहता मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का? आणि ते द्यायचं असल्यास कशाप्रकारे द्यावं लागेल.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : घटनेमध्ये दोन बाबतीत आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. एक शिक्षणसंस्थेमध्ये आणि दुसरं सरकारी नोकऱ्यांमध्ये. आता शिक्षणसंस्थेमध्ये जे आरक्षण ठेवण्यात आलेले आहे, ते घटना कलम 15 च्या खाली ठेवण्यात आलेले आहे आणि तिथे स्पष्टपणे असं म्हणण्यात आलेले आहे की, हे आरक्षण शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राईब आणि शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेले लोक यांच्याकरताच राहील. आणि अर्थात शिक्षणसंस्थांमध्ये म्हणजे खासगी शिक्षणसंस्थांमध्येही ठेवण्यात आलेले आहे. मग ते अनुदानित असो वा अनुदानित नसो. त्यामुळे आज कुठल्याही समाज समूहाला जर शिक्षणात आरक्षणाची मागणी करायची असेल, तर एकतर ते शेड्युल कास्ट किंवा शेड्युल ट्राईब याच्यामध्ये समाविष्ट आहे, असे दाखवावं लागेल किंवा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहेत, हे दाखवावं लागेल. आतापर्यंत परिस्थिती अशी झालेली आहे की, महाराष्ट्रात दोन आयोग नेमले गेले होते. या दोन आयोगांनीही असं ठरवंलं की, मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही. त्यामुळे त्यांचा या ज्या ओबीसी जाती म्हणून ज्यांची यादी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये आतापर्यंत समावेश झालेला नाही. आणि तो समावेश व्हावा, ही या मोर्चाची एक मागणी आहे. तशी मराठा समाजाची कित्येक वर्षे ती मागणी आहे. हा एक शिक्षणाचा प्रश्न.

नोकऱ्या ज्या आहेत, त्या केवळ सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व किंवा कुठल्याही मागास असलेल्या जातीसाठी आहेत. त्याच्यामुळे तिथे आर्थिकदृष्ट्या मागासलेले, फक्त शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले यांच्याकरिता जागा आरक्षिण ठेवण्यात येतात. परंतु, अट एवढीच आहे, मागासलेल्या समाज समूहाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्यात येईल, त्यांचं सरकारी नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्त्व अपुरं असलं पाहिजे.

P B Sawant 1

प्रश्न : आपण म्हटलात की, महाराष्ट्रामध्ये दोन आयोग नेमण्यात आले, ज्यामधून मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, असे अहवाल देण्यात आले. तर मग प्रश्न उरतो, शैक्षणिकदृष्ट्या मागास असण्याचा. यासंदर्भात काय करता येऊ शकतो?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला असावा लागेल. फक्त शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असून चालणार नाही किंवा फक्त सामाजिकदृष्ट्या मागासलेला असून चालणार नाही, तो शैक्षणिकदृष्ट्याही मागासलेला असायला पाहिजे. हे शिक्षणातील आरक्षणाबद्दल आहे. तर जर तिथे दुसऱ्या कुठल्या मागासलेल्या वर्गाला समाविष्ट करुन घ्यायचे असेल, शैक्षणिक राखीव जागांकरिता, तर घटना कलम 15 मध्ये आपल्याला दुरुस्ती करावी लागेल.

प्रश्न : ही दुरुस्ती काय असू शकते?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : त्याच्यामध्ये आज जे शेड्युल कास्ट, शेड्युल ट्राईब आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला हा वर्ग घातलेला आहे. त्याच्यात आणखी एक आर्थिकदृष्ट्या मागासलेला, असा वर्ग घालावा लागेल. आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले तर सर्वच आहेत. म्हणजे या देशातील जवळजवळ 85 टक्के लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, असे म्हणायला काही हरकत नाही आणि ते सर्व धर्म, सर्व जातींमध्ये आहेत. त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेला हा वर्ग आपण त्याच्यामध्ये आणला, तर सर्व जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागासलेले जे आहेत, त्या सर्वांना त्यात आरक्षण मिळू शकेल.

प्रश्न : सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना आरक्षण देण्यची तरतूद आहे. एखादी जात म्हणून आरक्षण देण्यची तरतूद नाही.   

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : जात म्हणून आरक्षण देण्याची नाही. ही जर दुरुस्ती करण्यात आली, तर आर्थिकदृष्ट्या मागासलेले, असा एक वर्ग त्या घटना कलम 15-3 मध्ये घालावा लागेल.

P B Sawant 4

प्रश्न : तुम्ही म्हणालात की, जो समाज मागासलेला आहे असे आपण म्हणतोय, त्या समाजाचा पुरेसं प्रतिनिधित्त्व जर सरकारी नोकऱ्यांमध्ये नसेल, तर त्या समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी आरक्षण लागू होऊ शकतं. तर ते थोडसं अधिक विस्ताराना सांगा.   

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : असंय की, सरकारी नोकऱ्यांमध्ये चार श्रेणी आहेत – वर्ग पहिला, वर्ग दुसरा, वर्ग तिसरा, वर्ग चौथा. तर वर्ग चौथ्यामध्ये जवळजवळ सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सर्व तऱ्हेने मागासलेले लोक आहेत, त्यांचं प्रतिनिधित्त्व आहे. भरपूर आहेत. किंबहुना त्या नोकऱ्यांत फक्त याच वर्गाचा समावेश आहे. तेव्हा प्रतिनिधित्व अपुरं आहे की पुरेसं आहे, याचा विचार करताना त्या त्या वर्गामध्ये जे प्रतिनिधित्त्व असेल, त्याचा विचार करावा लागेल. आज सचिवालयामध्ये शिपायांची जी जागा आहे, ती क्लास फोरमध्ये आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात मराठ्यांचा किंवा तत्सम जातींचं प्रमाण आहे. त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात त्यांचं प्रतिनिधित्त्व आहे, त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये आता कुठल्याच वर्गांमध्ये त्यांना प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही, असं म्हणणं चुकीचं होईल. तुम्हाला प्रत्येक वर्ग धरुन, त्या वर्गामध्ये किती प्रतिनिधित्त्व आहे, हे तुम्हाला शोधावं लागेल.

प्रश्न : पण आज सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांकडून सांगितलं जातंय की, आम्ही जात म्हणून आरक्षण देऊ. असं आश्वासन दिलं जातंय. तर हे कायद्याच्या कसोटीवर, निकषांमध्ये बसणारं आहे का? की हे राज्यकर्ते दिशाभूळ करत आहेत?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : हे घटनाबाह्य होणार आहे. आणि जात किंवा धर्म यांच्या नावाने काही कोटा जर आरक्षणात ठेवण्यात आला, तर ते बेकायदेशीर होणार आहे. तेव्हा या आश्वासानांना कायदेशीर काही आधार नाही. आणि ती पोकळ ठरणार आहे.

प्रश्न : कायद्याच्या कसोटीवर टिकण्याची शक्यता नाही?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : शक्यता नाही.

प्रश्न : म्हणजे आता मराठा आरक्षणासंदर्भात स्टेज ही आहे की, राज्य सरकारने जातनिहाय आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे, ते न्यायालयाने फेटाळलेलं आहे. द्यायचं झालं तर जातनिहाय आरक्षण मागे घेऊन, आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु करायला हवेत. जर सरकारला खरंच हा प्रश्न सोडवायचा असेल तर.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : बरोबर.

P B Sawant 5

प्रश्न : काही राजकीय पक्ष, पक्षांचे नेते अशी भूमिका मांडतायेत की, आरक्षण हे फक्त आणि फक्त आर्थिक निकषांवरच द्यायला हवं. याबद्दल तुमची काय भूमिका आहे?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : ही मागणी केवळ आजच होत नाही. फार पूर्वीपासून होत आलेली आहे. पण जे लोक ही मागणी करतात, तू एक मुलभूत गोष्ट विसरतात. ती अशी आहे की, प्रथमत: आज जे आरक्षण, मग ते एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठी असेल, ते वास्तवात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठीच आहे. दुसरं असं की, आपण हे विसरतो की, या समाजामध्ये शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले, असे वर्ग आहेत. परंतु, शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या लोकांमध्येही आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक आहेत. जर तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या मागासलेपण, या एकाच निकषावर आरक्षण ठेवलं, तर या जागांचा उपयोग जास्त कोण करु शकतील? तर जे शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले लोक आहेत, तेच करु शकतील. कारण शेवटी तुम्ही गुणाप्रमाणे जाणार. म्हणजे आजची जी व्यवस्था आहे, ती तशीच कायम राहणार आहे. त्यामुळे हा विचार लोक करत नाही. थोडा उथळ विचार करतात.

प्रश्न : आर्थिकदृष्ट्याच फक्त आरक्षण असावं, हा उथळ विचार आहे?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : हा अत्यंत उथळ विचार आहे. कारण त्यांना आरक्षणाचा हेतूच समजलेला नाही. आरक्षण हे मृगजळ आहे. आरक्षणामुळे अगदी मागासलेल्या वर्गातील लोकांचं सुद्धा, मग ते शेड्युल कास्ट असो, शेड्युल ट्राईब असो किवां ओबीसी असो, किती लोकांचं कल्याण होणार आहे? आणि मी असं धरुन चालतो. म्हणजे आजच्या या मोर्चांचं मी स्वागत या दृष्टीने करतो की, मराठा समाज का होईना, पण कुठल्यातरी समाजाने इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत. ही जी शक्ती निर्माण झाली आहे. एकजूट. आणि त्याच्यातून जी ऊर्जा निर्माण झाली आहे. हीचा उपयोग एक विशाल क्रांती करण्याकरता, की ज्या क्रांतीमुळे आम्हाला या देशामध्ये असा समाज निर्माण करता येईल की, जिथं सर्वांना नोकऱ्या, सर्वांना मोफत शिक्षण प्राप्त झालेलं असेल. त्या ध्येयाकडे आमचं लक्ष नाही. उलट त्या ध्येयापासून आमचं दुर्लक्ष होत आहे.

प्रश्न : म्हणजे आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन मूळ प्रश्नापासून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होतोय.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : हे आपण जे बोललात, ते बरोबर आहे. तेच मला सांगायचं आहे. म्हणून आता, आता तरी असे मी म्हणेन. आता 66 वर्षे जाली घटना येऊन. घटनेतील आपले जे मार्गदर्शक तत्त्व आहेत, त्याच्यामध्ये अशा समाजाचा आराखडा देण्यात आलेला. तो आराखडा जर आपण कार्यान्वित केला किंवा त्याची अंमलबजावणी केली किंवा अंमलबजावणी करावी, असा आग्रह धरुन चळवळ केली, तर आज आपण असा समाज निर्माण करु शकतो.

P B Sawant 3

प्रश्न : आंबेडकरांनीसुद्धा आरक्षणाची तरतूद करताना असं म्हटलं होतं की, हे 10 वर्षांसाठी आहे आणि 10 वर्षांनंतर याचा पुनर्विचार व्हावा, पुनरावलोकन व्हावं. तर याबद्दल काय वाटंत की, पुनरावलोकन कशाप्रकारे व्हायला हवं? आणि आता जे आरक्षण चालू आहे, त्याच्यामध्ये बदल करायचे असल्यास त्यामध्ये कशाप्रकारे करायला हवेत?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : काय आहे, ही जी 10 वर्षांची जी तुम्ही मुदत सांगितली मला, ती आज तरी घटनेमध्ये फक्त संसद, विधानसभा यांच्यामध्ये ज्या जागा आहेत, त्यांच्यापुरतीच घटनेत लिहिलेली आहे. या नोकरीतल्या किंवा शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षणात अशी कुठलीही मुदत घातलेली नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. लोकांचा गैरसमज आहे यो गोष्टींमध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की, हे जे आरक्षण देण्यात आलेले आहे, ते प्रत्येक मागास समाजाला म्हणून दिलेले आहे. कुठल्याही व्यक्तीला किंवा कुटुंबासाठी ते ठेवलेले नाही. त्याच्यामुळे ज्यांनी आरक्षणाचा उपयोग केलेला आहे, ज्यांना फायदा मिळालेला आहे, त्यांनी निदान एक किंवा दोन पिढ्यांनंतर आरक्षण मागू नये. आपल्याच समाज समूहातील जे इतर आहेत, त्यांच्यासाठी त्या जागा मोकळ्या करायला हव्यात. या दृष्टीने विचार व्हायला हवा. पण त्याकरिता आपण क्रिमिलियर लावले आहे. क्रिमिलियरमध्ये जर त्यातले लोक गेलेले असतील, तर ते आरक्षण कक्षेच्या बाहेर जातात.

प्रश्न : पण अनुभव असा आहे की, क्रिमिलियरची तरतूद जरी केलेली असली, तरी उत्पन्नाचा दाखला कसा मिळतो, त्याच्यामध्ये तुम्ही कसं तुम्हाला हवा तसा दाखला घेऊ शकता, हे सर्वांना ठाऊक आहे. तर ही जी आपली एकंदरीत व्यवस्था आहे, ती तुम्हाला अधिक व्यवस्थित करायला लागेल.  

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : शेवटी ही सरकारी यंत्रणा आहे. आणि सरकारी यंत्रणेत, मग ते सर्व खात्यांमध्ये जे दोष आहेत, ते या यंत्रणेतही आहेत. तेव्हा याचा उपाय म्हणजे ही यंत्रणा सुधारणं हा आहे. म्हणून आरक्षण काढावं किंवा त्याचा अमूलाग्र पुनर्विचार करावा, असं नाही. सदोष यंत्रणा सुधारणं, हा एकच त्यावरील उपाय आहे.

P B Sawant 2

प्रश्न : आपण बघतो की, विदर्भामध्ये कुणबी म्हणून आरक्षण मिळतं याच समाजाला. इकडे पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्यात मात्र मराठा म्हणून जी नोंद आहे, त्यामुळे आरक्षण मिळत नाही.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : ही नावं झाली. वर्ग तोच आहे. म्हणजे एका शेतकऱ्याला विदर्भामध्ये कुणबी म्हटलं जातं, इथे मराठा म्हटलं जातं. त्याच्यामुळे त्याच्या परिस्थितीत काही फरक होतो का?

प्रश्न : मग सर नाव बदललं तर प्रश्न सुटेल का?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : नाही. आता हा नावाचा प्रश्न राहिला नाही, वर्गाचा प्रश्न झालेला आहे. इथं आता नुसतं कुणबी म्हणून ते चालणार नाही किंवा तिथल्या कुणब्यांना मराठा म्हणून त्यांना जे आरक्षण मिळतंय ते काढून घ्या, हे करुन चालणार नाही. हे होणार नाही. ते शक्यही नाही. तेव्हा त्याला अंतिम उपाय हाच आहे की, आपण याकरता चळवळ केली पाहिजे की, या देशात नवसमाज निर्माण होईल. जो आमच्या घटनेला अभिप्रेत आहे. जिथे आम्हाला आरक्षण ठेवण्याची गरज पडणार नाही.

प्रश्न : एवढे मोठे मोर्चे अतिशय शांतपणे, सुनियोजितपणे होणे, कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्यामध्ये न होणं.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : हा तर आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे. याचाच उपयोग आपल्याला करायचा आहे. त्याच्याकरिता सर्व समाजातील, सर्व मागासलेल्या समाजातील नेत्यांनी एकत्र आले पाहिजे, एकमेकांशी भांडत न बसता. यांनी मोर्चा काढला म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात मोर्चा काढतो, असे नको व्हायला. सर्वांनी एकत्र येऊन, खरंतर मोठी संधी चालून आली आहे. हे नेत्यांनी समजून घ्यायला हवी.

निरनिराळ्या ठिकाणी भाषणं करत फिरत असतात फक्त आणि आपापल्या समाजाला आश्वासानं देत फिरत असतात, ते थांबवून या क्रांतीसाठी आता ही चळवळ सुरु करायला हवी. निदान आता तरी सुरुवात व्हायला हवी. आणि पहिली मागणी आपली अशी असायला पाहिजे की, आमच्या घटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्त्व सागितली आहेत, त्याच्यामध्ये जी आर्थिक धोरणं सांगितली आहेत, जी सामाजिक धोरणं सांगितली आहेत, त्यांची ताबडतोब अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यांना मुलभूत हक्कांचं स्थान देण्यात आले पाहिजे.

प्रश्न : जेणेकरुन असे प्रश्न निर्माण होणार नाहीत आणि आरक्षणाचा जो गुंता केला जातो आहे, त्यामध्येच सर्व अडकून पडणार नाहीत.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : मागासलेल्या समाजाचे जे पुढारी आहेत, त्यांनी हे समजून सांगायला हवं की, त्यांचे प्रश्न आरक्षणाने सुटणार नाहीत. उलट बहुजनसमाजामध्ये, जे मागासलेले समाज आहेत, त्यांच्यामध्ये दुही निर्माण होणार आहे. त्यामुळे आपलं जे लक्ष असायला हवं, त्यापासून लक्ष विचलित होईल. उलट आज असं दिसतंय की, या देशातील जो प्रस्थापित वर्ग आहे, तो खुश आहे. कारण आजच्या समाजरचनेत, आजच्या आर्थिक रचनेत त्यांचे फायदे होत आहेत. त्यांचा तो एक स्वार्थ निर्माण झाला आहे. तर ते कायम राहावेत आणि इतरांनी दुसरीकडे लक्ष वळवावं, ही आजची समाजरचना मोडू नये, तिला हात लावू नये म्हणून प्रयत्न होत आहेत. आणि ते यांचा उपयोग करुन घेणार आहेत. आपण जर सारा इतिहास पाहिला, तर आपल्याला असंच दिसून येईल. ज्यांना खास हक्क प्राप्त झालेले आहेत, मग ते सामाजिक व्यवस्थेत असो, आर्थिक व्यवस्थेत असो, ते आपापलं स्थान मजबूत करण्याकरिता आणि सुरक्षित करण्याकरिता त्यांनी वेळोवेळी याच मार्गाचा अवलंब केला.  

P B Sawant 4

प्रश्न : आरक्षण नक्की किती टक्के असावं? तामिळनाडूचं उदाहरण त्यासाठी आपल्यासमोर आहे. तर ते आपल्या येथे शक्य आहे का? तामिळनाडूमध्ये जे झालं, ते आपल्या येथे का नाही?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : याचे दोन भाग आहेत. एक म्हणजे ही टक्केवारी आहे, ती किती पवित्र आहे. दुसरं असं की, टक्केवारी जरी आपण वाढवली, तर कुठल्या एका विशिष्ट जातीचं कल्याण  होणार आहे का? हा दुसरा प्रश्न.

पहिलं आपण टक्केवारीचं बघू. टक्केवारी कशी आली आहे, कुठल्या तत्त्वावर आलेली आहे? असं मानलं गेलं की, नियम हा नेहमी मोठा असतो. त्याला अपवाद म्हणून आरक्षण. तर अपवाद हा कमी असायला पाहिजे. पण हेच अवास्तव आहे. अवास्तव याकरिता की, या देशामध्ये 85 टक्के मागासलेले आहेत, 15 टक्के पुढारलेले आहेत. मग इथला नियम कुठला? 85 टक्के हा नियम झाला, 15 टक्के हा अपवाद होईल. मग आरक्षण ठेवायचं झाल्यास, पुढारलेल्या वर्गासाठी ठेवा आणि 85 टक्के ओपन कॅटेगरीसाठी ठेवा. म्हणजे मागासलेल्यांसाठी. म्हणजे सर्व मागासलेल्या जातींना 85 टक्के आरक्षण मिळेल. त्यामुळे या टक्केवारीला विशेष असं काही पावित्र्य नाही.

प्रश्न : कायद्याच्या पटलावर हे टिकेल का?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : अशी मांडणी झाली पाहिजे. समजा असं आपण धरुन चालू की, मराठा समाज असो वा दुसरा आणखी कोणता समाज, ते असे म्हणाले की आमचा समाज ओबीसीमध्ये करा. तर ओबीसीसाठी ज्या आज 27 टक्के राखीव जागा आहेत, त्या वाढवा. मग 22 टक्के वाढवा, 25 टक्के वाढवा आणि त्या वाढवल्या गेल्या. परंतु हे 25 टक्के मराठा जातीसाठी म्हणून ठेवण्यात येणार नाही. त्या ठेवता येणारच नाही. जातीसाठी ठेवणं हे घटनाबाह्य आहे. फक्त हे 25 टक्के ओबीसींच्या 27 टक्क्यांमध्ये अॅड होतील. म्हणजे 43 किंवा 45 टक्के होतील. परंतु हे सगळ्या ज्या 45 टक्के राखीव जागा आहेत, त्यामध्ये सर्व ओबीसी जातींना आरक्षण मिळेल. म्हणजे सर्व जातींना स्पर्धा करावी लागेल, या 45 टक्क्यांसाठी. असं नाही म्हणता येणार की, हे 25 टक्के मराठ्यांसाठी ठेवले आहेत, त्यामुळे इतर ओबीसी जातींनी त्यात भाग मागू नये. असं करता येत नाही.

प्रश्न : वेगळे असे मराठा समाजासाठी नाही ठेवता येत?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : मराठा समाजासाठीच नव्हे, कुठल्याच समाजासाठी तसं करता येणार नाही.

प्रश्न : दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करण्याची. काही ठिकाणी तो रद्द करावा, अशीही मागणी झाली. मात्र,प्रामुख्याने मागणी झाली म्हणजे त्या कायद्यात बदल करण्याची. या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटतं?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : अॅट्रॉसिटी कायदा चांगला आहे. तो असायला पाहिजे. त्याचा दुरुपयोग होत आहे. पण याचा अर्थ असा नाही, डोकं दुखलं म्हणून डोकं कापून टाका. आपण त्याकरिता उपाय शोधून काढतो. उपाय आहेत.

कशामुळे हा दुरुपयोग जास्त होतो आहे? आज या कायद्यान्वये पोलिसांकडे तुम्ही तक्रार केली, तर आरोपीला ताबडतोब अटक करुन कस्टडीत टाकण्याची पोलिसांना परवानगी आहे. तर हा जो पोलिसांना अधिकार दिला आहे, तो पोलिसांना अधिकार न देता, तक्रार आल्याबरोबर अटक न करता, जी खास न्यायालयं नेमण्यात आलेली आहेत, त्या न्यायाधीशांची परवानगी घेतल्यानंतरच आरोपीला अटक केली पाहिजे.

प्रश्न : जातीय अत्याचार झाला आहे का, याची खातरजमा आधी व्हायला हवी. त्यानंतरच अटक व्हायला हवी.

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : पण खातरजमा न्यायाधीश करणार नाही. पोलीस अधिकारी करणार. न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला अटक करावी.

P B Sawant 1

प्रश्न : जर कुणावर जातीय अत्याचार झालेला आहे, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या सर्व गोष्टी न्यायालयासमोर मांडाव्यात?  

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : न्यायालयात म्हणजे कोर्टात जाऊन सर्व सिद्ध करावं आणि अटक करावी, असं नाही. जो न्यायाधीश असेल, त्याच्या परवानगीने अटक करावी. कारण त्याच्या घरी रात्री जाऊन सुद्धा ही परवानगी घेता येते. जसं की एखादा जामीन मागायचा झाल्यासही आपण रात्री जाऊनही जामीन मागू शकतो, तशी परवानगी हवी.

आता याचबरोबर दलितांच्याही तक्रारी आहेत आणि त्याही बरोबर आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या तक्रारी लिहून घेण्यातच येत नाहीत. एफआयआर दाखल करुन घेतलाच पाहिजे, अशी खास तरतूद करण्यात आली पाहिजे. आणि जर तो दाखल करुन घेण्यात आला नाही. तर जो कुणी पोलीस अधिकारी तिथे असेल, तो गुन्हा करतो आहे, असे मानले जावे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. ही एक सुधारणा त्यात झाली पाहिजे.

दुसरी महत्त्वाची सुधारणा म्हणजे, या ज्या तक्रारी होतात आणि त्यामुळे जे खटले चालतात. हे किती दिवसात निकालात काढले पाहिजेत, याचं काही विशिष्ट काळाचं बंधन घातलेलं मला तरी दिसलं नाही. तेव्हा सहा महिन्यांच्या आत हे खटले निकालात काढावेत, अशी तरतूद कायद्यात केली पाहिजे. म्हणजे काय होईल, एक तर दलितांना संरक्षण मिळेल, किंबहुना आजचं संरक्षण आणखी मजबूत होईल आणि आणि आरोपी जे आहेत, ज्यांच्याविरुद्ध कायद्याचा दुरुपयोग होतो, त्यांनाही संरक्षण मिळेल. त्यांनाही न्याय मिळेल.

प्रश्न : आपल्याला जातीअंताकडे जायचं असेल, तर त्यासाठी काय करायला हवं?

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत : सर्व जाती या सांस्कृतिकदृष्ट्या एका पातळीवर आल्याशिवाय त्यांच्यामध्ये बेटी-व्यवहार होणार नाही. म्हणून आपण सर्व जातींना संस्कृतिकदृष्ट्या एका पातळीवर आणलं पाहिजे. या मागासलेल्या जाती जर त्या सांस्कृतिक पातळीवर यायच्या असतील, तर त्यांना शिक्षण,  त्यांची आर्थिकदृष्ट्या उन्नती ही किमान व्हायला पाहिजे आणि आरक्षणाचा हेतू काय शेवटी? की ज्या मागासलेल्या जाती आहेत, त्यांना पुढारलेल्या जातींच्या पातळीवर आणणं. हे जे पाऊल टाकण्यात आलेले आहे, ते द्रुतगतीने पुढे जायला पाहिजे. आणि केवळ काही व्यक्ती, काही कुटुंब वर येऊन चालणार नाही. संबंध जाती म्हणून किंवा जात समूह म्हणून त्यांचा उद्धार झाला पाहिजे. म्हणूनच मी म्हणतो, आम्हाला जो नवीन समाज निर्माण करण्याचा आदेश दिलेला आहे घटनेने आणि आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत असा समाज निर्माण करण्याकरता, त्यादृष्टीने त्वरित पावलं उचललं गेली पाहिजेत. ही केवळ महाराष्ट्रापुरती क्रांती नाही. संबंध देशभर ही क्रांती झाली पाहिजे.

म्हणूनच मी या क्रांतीकडे सबंध देशातील समाजक्रांतीची नांदी या दृष्टीने पाहतो

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

DATE: 03-10-16: FROM MR YASHWANTRAO S MORE, MUMBAI:

शीतल पाटील यांनी पाठवलेला अभ्यासपूर्ण मेसेज

*उठ मराठ्या जागा हो!*
आपल्या वर आरक्षण मागण्याची वेळ कुणी आणली? कोण आहे आपले शत्रू ओळख.

*साखर कारखाने -*
कोल्हापूर जिल्हा - एकूण 19 ,मराठा वर्चस्व-14
सांगली  - एकूण 16 ,मराठा वर्चस्व-13 ,
सातारा -एकूण 9,मराठा वर्चस्व- 9
पुणे-  एकूण 12 मराठा वर्चस्व 11,
सोलापुर- एकूण 16, मराठा वर्चस्व 12,
अहमदनगर - एकूण 17, मराठा वर्चस्व -15,
नाशिक -एकूण 5, मराठा वर्चस्व 4  ,
नंदुरबार-एकूण 3,मराठा वर्चस्व 1
जळगाव -एकूण 7 मराठा वर्चस्व 4 ,
औरंगाबाद -एकूण 7,मराठा वर्चस्व 6,
जालना -एकूण 5 मराठा वर्चस्व 4,
बीड- एकूण 8, मराठा वर्चस्व 5
हिंगोली- एकूण 3, मराठा वर्चस्व 2,
परभणी - एकूण 3, मराठा वर्चस्व 1 ,
नांदेड - 7, मराठा वर्चस्व 5,
उस्मानाबाद - एकूण 9, मराठा वर्चस्व 3,
लातूर - एकूण 10, मराठा वर्चस्व 6,
यवतमाळ - एकूण 4 , मराठा कुणबी वर्चस्व 2  ,
अकोला - एकूण 2, मराठा-कुणबी  1 ,
अमरावती - एकूण 3, मराठा-कुणबी 1 ,
वर्धा- एकूण 2 मराठा-कुणबी  2 ,
नागपूर - एकूण 2, मराठा-कुणबी  2 ,
भंडारा-एकूण 1,  कुणबी-मराठा  1

महाराष्ट्रातील एकूण साखर कारखाने - 170
धनदांडग्या मराठा सम्राटांचे कारखाने - 124

*मराठा सम्राटांच्या ब्यांका पतसंस्था -*
1 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 31
2 जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण विकास  बँक 29
3 प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था 21451
4 कापूस जिनिंग आणि प्रेसिंग सहकारी संस्था 164
5 सहकारी सूत गिरणी 167
6 सहकारी हातमाग संस्था 685
7  सहकारी यंत्र माग संस्था 1378
8 सहकारी दुध उत्पादक संस्था 27110
9 सहकारी दुध संघ 78
10 सहकारी मार्केटिंग संस्था 1779

मराठा सम्राटांच्या हातातील शिक्षण संस्था -
इंजिनअरिंग कॉलेज आणि इतर तंत्रशिक्षण संस्था - एकूण 2597, मराठा वर्चस्व - 2500
वैद्यकीय महाविद्यालये - एकूण 14, मराठा वर्चस्व 12
वैद्यकीय डेंटल महाविद्यालये - एकूण 25, मराठा वर्चस्व 20
आयुर्वेदिक कॉलेज - एकूण 40, मराठा 32

*मराठा मंत्रिमंडळ -*

यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1960 एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 6
यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ -1962 एकूण मंत्री -17
मराठा मंत्री 9
वसंतराव नाईक मंत्रिमंडळ -   1967 एकूण मंत्री -17
मराठा मंत्री 10
वसंतराव नाईक मंत्रिमंडळ -  1972 एकूण मंत्री -12
मराठा मंत्री 4
शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ -1975 एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 9
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1977  एकूण मंत्री -23
मराठा मंत्री 14
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ -1978( युती) एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 8
शरद पवार ( युती)   मंत्रिमंडळ 1978 एकूण मंत्री -17
मराठा मंत्री 8
अ.र. अंतुले मंत्रिमंडळ  1980 एकूण मंत्री -15
मराठा मंत्री 9
वसंतदादा पाटील मंत्रिमंडळ 1983 एकूण मंत्री -14
मराठा मंत्री 6
शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळ 1986 -एकूण मंत्री -8
मराठा मंत्री 5
शरद पवार मंत्रिमंडळ (युती) 1990- एकूण मंत्री -15
मराठा मंत्री 9
मनोहर जोशी (युती) 1995,एकूण मंत्री -22
मराठा मंत्री 4
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 1999( युती) ,एकूण मंत्री -26
मराठा मंत्री 16
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2004( युती) एकूण मंत्री-27
मराठा मंत्री 13
अशोक चव्हाण- डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010
विलासराव देशमुख मंत्रिमंडळ 2010( युती) एकूण मंत्री -29
मराठा मंत्री 14
पृथ्वीराज चव्हाण- नोव्हेंबर 2010 ते  सप्टेंबर 2014
मंत्री -30
मराठा मंत्री 16
--------------
आपल्या जातीतल्या नेत्यांना आपण मोठं केलं. पण त्यांनी फक्त स्वत:चे घर भरलेत. स्वत:च्या मुलांना नातेवाईकांना मोठं केलं. आणि आपण मात्र राहिलो अल्पभूधारकच, द्रारिद्र्यरेषेखालीच, गरीबच.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि गरीब मराठ्यांच्या परिस्थितीसाठी कारणीभूत हे आपलेच सरंजामी नेते आहेत. दुसरे कुणी नाही. म्हणून आता तरी जागा हो मराठ्या.

हा मॅसेज इतका शेअर करा की हा मॅसेज आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचायला हवा. मॅसून वाचून आपल्या नेत्यांना स्वत:चीच लाज वाटायला हवी.

शीतल पाटील, एक शेतकऱ्याची पोर

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

06-10-16: FROM MR SATISH SAWNANI, FLAT NO. 304, DIAMOND ISLE III:

*Supreme Court Judgement on Transfer of Flat to Nominee*
Land Mark Judgement: Nominee of Deceased Member is absolutely entitled for the Ownership by transfer, Co-op. Soc can't challenge the right of Nominee a settled Law of the land. No legal heirship, court order or succession certificate is required. Please circulate, important for society members and  office bearers.

Reference:
http://supremecourtofindia.nic.in/FileServer/2016-04-19_1461073219.pdf

रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

DATE: 02-10-16: FROM MR VASANT DAGDU SADAFULE, JAMKHED, DIST. AHMEDNAGAR:

 👉 वेळ काढुन अवश्य वाचा
---------------------------

----: दैनिक मराठा आचार्य अत्रे:-----

गुरुवार, दिनांक 6 डिसेंबर 1956, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजली पर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे.....!!!

अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा' तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा '7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख'.

"सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतात ल्या अस्पृश्याचां आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानु शतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते."

"आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते. 

आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. 

आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली 'भीमा'ची गदा होय.

आंबे़डकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. 

आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय. 

आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यां च्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक यु्द्धच होय."

"महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध" हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले, की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.

पतित स्त्रियांच्या उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले.

कबिराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. ह्त्तीच्या पायी देण्यात आले आणि मग तो मेल्यानंतर हिंदू-मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले. 

बुद्धधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धांच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या."

... हालअपेष्टा आणि छळ ह्यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा "बंडखोर गुरूंचे" आंबेडकर हे सच्चे चेले होते."

"जुलूम आणि अन्याय म्हटला की, आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्या धमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखविल्या प्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमा विरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले."

"हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरां ची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण त्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलुमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन, पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती आणि त्यांनी ती शेवटपर्यंत खरी करून दाखवली."

"जो तुमचा धर्म मला कुत्र्या-मांजरा पेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यवधी हिंदुधर्मीयांना कित्येक वर्षांपासून ते बजावत होते. माणसासारख्या माणसांना 'अस्पृश्य' मानणारी ती तुमची 'मनुस्मृती' मी जाळून टाकणार, असे त्यांनी या सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. ह्यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांही हिंदुधर्माचे भयंकर दुष्मन आहेत." 

"धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी ह्यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की, आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील.!"

"आंबेडकरांची धर्मांतरांची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे, असे आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वर्ण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत होते."

"धर्मातराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, 'हिंदू धर्मावर' मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षाच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण ह्या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही ..! "

"हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस ह्यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जीनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करून हिंदी स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत, अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली."

"अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतद्यावादी आणि भावना प्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशां विरुद्ध गांधीजीं नी जसे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये, असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यता निवारणाबाबत गांधीजी आणि आंबेडकर हयांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होता. म्हणून साम्राज्यशाही विरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही."

तथापि, गांधीजींबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असतानाही केवळ त्यांचे प्राण वाचवण्या साठी म्हणून "अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघा" ची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि 'पुणे करारा' वर सही केली."

"... 'गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा' 'आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा' ह्याचा अर्थ हिंदू समाजाला अद्याप समजू नये याचे आम्हाला दु:ख होते."

'पुणे करारा' वर आंबेडकरांनी सही करून गांधीजीं चे प्राण वाचविले, पण स्वत:चे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण, ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी 'पुणे करारा' वर सही केली, तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांना दाखविला नाही. आपल्याला धार्जिण्या असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले."

"आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की, स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!"

"नऊ कोटी मुसलमानांना खूष करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापली कडे काँग्रेसने काहीही केले नाही. असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच 'घटना समितीत'अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, 'जगातील कोणतीही सत्ता ह्या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे, असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही!' आंबेडकरांचे हे उदारपण हा त्यांच्या देदीप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय."

काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली.

'मनुस्मृती जाळा' म्हणून सांगणारे आंबेडकर 'भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार' व्हावेत हा काय योगायोग आहे? 

"घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी 'हिंदू कोड' तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेस मधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या. आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही."

"आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती."

"पण, दुर्दैव भारताचे ..! दुर्भाग्य हिंदू समाजाचे ..! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वत:चा घात करून घेतला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वत:चा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीन-दीन अनुयायांचा उद्धार करण्यासाठी त्यांना मानवजातीला 'समतेचा, दयेचा आणि शांतीचा' संदेश देणाऱ्या त्या 'परम कारुणिक बुद्धाला' शरण जाण्यावाचून गत्यंतरच उरले नाही.

"आंबेडकरांच्या विव्दत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीचा, विव्दत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात – नव्हे भारतात या क्षणी नव्हता.  ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हत."

"महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून तो घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्क-कर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिर्भूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे, असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले."

"त्यांना कोणतेही आणि कसलेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे, असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्र्वराची देखील प्राज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सदैव संचारलेले असे."

"अनेक वर्षाच्या आध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने शेवटी आंबेडकर 'भगवान बुद्धा' च्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यांनाच नव्हे, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच ता. १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धर्माची जेव्हा दीक्षा दिली तेव्हा 'साऱ्या भारताला मी बौद्ध करीन' अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांना केली."

"मुंबईतील दहा लाख अस्पृश्यांना थोड्याच दिवसांनी ते बुद्ध धर्माची दिक्षा देणारे होते. पण दृष्टांत काही निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलुमाशी संबध जगभर झगडून झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातील कणन् कण आसुसला होता. भगवान बुद्धाच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेर आसरा मिळाला, तेव्हा त्यांना अंत:करणात जळणारा वन्ही शीत झाला. आपल्या कोट्यवधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतारकार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योती निर्वाणात कधी विलीन करून टाकली, त्याची जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्तासुद्धा लागली नाही."

'मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे; पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही!' ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती. सुडाची नव्हती. झगडा करून असहाय झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्धार होते. 

"आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे. शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी. आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा अधिक प्रकाश पडेल, तसतसे अलौकिकत्व प्रकट होईल. आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते, अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते."

"महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही, असे ते म्हणत. कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या उद्धारांचे स्मरण करावयाचे? सात कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळ्यातंले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावे की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे."

"त्यांनी जो मार्ग आखला आणि जो प्रकाश दाखवला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यवधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायाचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विव्दत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकूळ हृदयाने आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो."

👉(मराठा : 7-12-1956) बाबासहेबाना जे आजुनही समजू शकले नाही त्याना हां लेख नक्की पाठवा---------