शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

DATE: 15-10-16: FROM ADV SHRIGANESH SALBA SAWALKAR, TULJAPUR:

 👏🏻👏🏻अाता शेतकरी समाजाने बदललेच पाहिजे🌷🌷🐄🐃🐏🐬🐓🐠🐟🌲🌳🌻🌴🌱
____________________
1-अाहे ती मंदिरे पुष्कळ अाहेत.नवीन मंदिरं उभारणी बंद करा.वर्गणी देऊ नका. किती मंदिरात तुमच्या मुलांना पुजा-याची नोकरी लागली. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटूंबाच्या अारोग्यावर, गुंतवणूकीवर करा.

2-दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्ती नादात व्यक्ती प्रगतीचे (वेळ नि पैसा) चक्रच मारून टाकतो. पैसा व बुध्दीचा अपव्यय होतो. कर्मातच देव अाहे यावर विश्र्वास ठेवा.(भक्त पुंडलिक)

3-'माणूस सोबत काहीच घेउन जात नाही'. हे सांगण्यासाठी बुवा २०,०००रू. घेतो. या बाबांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, अाराेग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे अायोजन करा.

4-शेतीतील, कुटूंबातील, गावकूसातील वाद समापोचाराने मिटवा. काेर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा.

5-कुटूंबातील सदस्यावर सर्वात जास्त प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दू:खात तेच तुमची  जास्त काळजी घेणारे अाहेत.

6-शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्याेग-व्यवसायाकडे वळा. आणि एकमेकानां व्यवसायाठी शक्य तेवढी मदत करा.

7-अापण  सर्व जाती-धर्मांचा अादर करा. जातीवादाच पाप अापण तरी करू नका.

8-मोडेल पण वाकणार नाही. या स्वभावात बदल करा. काळ खूप बदललाय याचे भान असू द्या.(महापुरे मोठी झाडे जाती, लव्हाळे वाचती)

9-राजकारण व राजकारणी यांचा नाद सोडा. या दोहोंमुळे समाजाचे खूप मोठ नूकसान झालेय. अाता बदला म्हणजे पुढच्या अनेक पिढ्याचं कल्याण होईल. यांचा फक्त मत "दान" पुरताच विचार करा.

10-कमीत कमी गावात अाणि जास्त वेळ शेतात राहा. किमान ८ तास काम कराच (कुठल्याही क्षेत्रात)

11-खेकडा वृत्ती सोडून समाजातील इतरानां मदत करा(एकमेका साह्य करा)

12-नियोजन व काटकसरीने(अाहे त्या उत्पन्नात) जीवन जगा. भोगवादाच्या नादात कर्जबाजारी होऊच नका.

13-यात्रा जत्रा सत्यनारायण वास्तुशांती जागरणगोंधळ डोहाळे(अोटीभरण) पाचवी बारावी वाढदिवस मर्यादीतच ठेवा.

14-भांडकुदळ लबाड पैसे बुडवणाऱ्याच्या पासुन लांब रहा. मदत करणाराचे कायमच ऋणी रहा.

15-घरातील महीलांना मानाची  वागणूक द्या. मुलींना उच्च शिक्षित करा.

16-महिलांना मंदिरं, उपासना, कर्मकांड यातून बाहेर काढा अाणि व्यख्यान,उद्बोधन वर्गाला न्या. त्यांच्या हातातील पोथ्या-पुराणांची संख्या कमी करा व इतिहास,विज्ञानाची पुस्तक हातात द्या.

17-कर्मकांड करणे टाळा.  त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.

18-आपण कमविलेल्या पैश्यातुन आपल्या कुटुंबाला खुप खुश ठेवा.

मानवजन्म पुन्हा नाही
____________________
👏🏻👏🏻💐💐💐💐👏🏻👏🏻