शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

DATE: 21-10-16: FROM MR RAMAKANT S NARAYANE, NAVI MUMBAI:

कक्कय्या समाज बांधवहो,

नुकताच पनवेल येथे  कक्कय्या  समाज्याचा वधू - वर मेळावा पार पडला. मीही सदर मेळाव्यास हजर होतो. सदर मेळाव्यामध्ये माहिती देण्यासाठी भावी वधू - वर व्यासपीठावर येत नव्हते.मोठ्या संख्येने समाज हजर असल्यामुळे सर्वांना हॉलमध्ये जागाही उपलब्ध नव्हती.तसेच मागील बाजूस व्यासपीठावरील वक्त्यांचा आवाजही ऐकू येत नव्हता. साधारण वधू - वरांकडील मंडळी वधू - वरांना बायोडेटा व फोन मागत असताना दिसत होते. वधू - वरांची माहिती असलेले पुस्तक, नाव नोंदवलेल्या मंडळींना साधारण दोन महिन्यांनी मिळेल. ते पाहून  वधू - वरांकडील मंडळी निर्णय घेतील. लांबचे स्थळ  पाहण्यास वेळ व पैसाही खर्च होतो. त्यामुळे मला विनंतीपूर्वक काही सूचना कक्कय्या समाज्यातील वधू -वर मंडळाचे पदाधिकारी यांना कराव्यात असे वाटले. त्या मी खाली देत आहे. 

१) वधू - वरांची नावे नोंदणी ई -मेल द्वारे आधीच करून ठेवावी. 
२) सर्व  उपस्थित वधू - वरांना पुढील तीन - चार रांगेत बसवावे. 
३) सर्व वधू - वरांचे चार स्लाईडचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) आधीच  तयार करून ते चार ते पाच स्क्रीनवर दाखवावेत. 
- पहिल्या स्लाईडवर वधू - वरांचे पूर्ण आकाराचे  दोन फोटो असावेत. 
- दुसऱ्या  स्लाईडवर बाओ-डेटा असावा. 
- तिसऱ्या स्लाईडवर फॅमिली फोटो असावा. 
- चौथ्या स्लाईडवर मुलाच्या / मुलीच्या अपेक्षा असाव्यात. 
४) प्रत्येक स्लाईडवर नाव व संपर्क मोबाईल नंबर द्यावा. 
५) नाव पुकारल्यावर वधू - वरांनी पुढे येऊन PPT च्या माध्यमातून आपली माहिती द्यावी. वधू / वर पुढे न आल्यास निवेदकाने ती माहिती वाचावी. व त्यावेळेस वधू / वराने व्यासपीठाजवळ येऊन उभे रहावे. 
६) वधू - वरांना व त्यांच्या पालकांना मंडळाकडे सर्व नावे नोंदविलेल्या वधू - वरांची थोडक्यात असलेली Excel मधील यादी नाव, संपर्क क्रमांक, जन्म दि., वय, शिक्षण, उत्पन्न, अपेक्षा  इ. सह द्यावी. 
७) वधू - वरांनी व त्यांच्या पालकांनी  PPT, वधू /वर यांना पाहून त्यांच्या अपेक्षेत बसणाऱ्या  वधू / वर यांच्या नावापुढे यादीवर खूण करुन ठेवावी. जमल्यास तेथेच मोबाईलवर .वर संपर्क करावा. 

मेळावा वधू - वरांसाठी असतो व त्यासाठी वधू - वर व त्यांचे पालक लांबून स्वखर्चाने आलेले असतात. समाज्याने त्यासाठी निधी दिलेला असतो. त्यामुळे पूर्ण वेळ वधू - वरांसाठी द्यावा. हार-तुरे, सत्कार, भाषणे हा कार्यक्रम थोडक्यात संपवावा. जास्तीत ज्यास्त वेळ वधू - वर संपर्कासाठी मिळेल अश्या प्रकारे मेळाव्याचे नियोजन असावे. मेळाव्यासाठी हॉल निवडतानाही सर्व बाबींचा व सोयीचा  विचार व्हावा. उपस्थितांनी कार्यक्रम सुरु असताना शांतता पाळावी.  समाज्यातील चालू घडामोडींचे चार पानी  पत्रकही उपस्थितांना देण्यात यावे. 

आपला समाज बंधू,

रमाकांत नारायणे 
Dt.21.10.16
DATE: 21-10-16: FROM MR VILAS J BORADE, DADAR, MUMBAI:

 🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
🌎   "बिल गेट" चे भारतीय   🌎
🌎      लोकांविषयी मत...    🌎
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
         सर्वांनी हे नक्की वाचा
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

तो म्हणतो,
"भारत हा जगात
सगळ्यात श्रीमंत देश आहे.
या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी "भारत हा महासत्ता होऊ शकतो,
परंतु ,
मजेची गोष्ट ही आहे की, या देशातील
लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून,
शेतकरी देवाला
दोष देत आत्महत्या करतो...।
कारण ,
त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण
आहे हेच त्याला कळत नाही ...।

या देशातील गरीब जनतेला कळत
नाही की तुमच्या गरिबीला कोण जबाबदार आहे ?

इथल्या तरुणाला
कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे...?

भयाण वास्तव...

१) इथल्या तरुणाला गुलामी कळू नये
म्हणून, क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदीरे, यांची अफूची गोळी दिलेली असते तो त्यामध्येच गुंग झालेला असतो...
तसेच,
पायी, वारी, सण, उत्सव यांच्या नादी
लावले जाते....।

मग, ताण (Tension)  आला की दारूचे दुकान जवळ असते....

करतो जीवन बरबाद...,
मग, स्वतःला दोष देतो ...

२) इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून...
भांडणे लावणाऱ्या मालिका,
तसेच उपास- तापास, व्रत-वैकल्ये....
यांमध्ये त्या गुंग
असतात ...

मग त्यांचे कुटुंब आणि
त्या...

त्यांना मग कोण सहन होत नाही ...(सासू, सासरे)

३) इथले नोकरी असणारे पुरुष असतात...

ते घाण्याला लावलेल्या
बैलासारखे राब-राब राबत असतात...

बँकेने दिलेले हफ्ते फेडण्यासाठी....

त्यालाच कळत नसते तो काय करतो ...
कारण, पगार जरी एक
लाख असला तरी ८०,००० हफ्ते
फेडण्यासाठी घालवत असतो ....।

एका बँकेचे कर्ज फेडले की मग, बायको दुसरे (मोठे घर) कर्ज
काढायला सांगते...

काम एवढे असते
की तो डोके वर काढू शकत नाही...

4) जेष्ट नागरिक ...
नोकरी करून शेवटी कुणीही त्याचे ऐकत नाही ...।

आश्रमाची वाट बघत असतो...

आणि,
जे लोकं जागरूक आहेत त्यांना...
अंधश्रद्धा निर्मुलन समिती, भ्रष्टाचार निर्मुलन समिती..

अनेक NGO मार्फत ..
वेगवेगळ्या पक्षाद्वारे गुंतून ठेवले जाते ...

मग कसा बदल होणार...?
कोण करणार...?

आता बाकी आहेत
त्यांनी विचार करावा...

🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
🌎   "बिल गेट" चे भारतीय   🌎
🌎      लोकांविषयी मत...    🌎
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
         सर्वांनी हे नक्की वाचा
    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼