गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

DATE: 29-09-16: FROM MR SADASHIV M MATE, KANDIVALI, MUMBAI THROUGH FACEBOOK:

गर्दीचे मोजमाप कसे असते?  
१)चालतांना 
१ कि. मी=१०००*१२ मिटर (साधारण रस्ता) =१२००० स्के. मिटर=१२९१२० स्के फुट
१ कि. मी=१६ एकर
१ एकर= ४०४८ स्के मिटर
१ स्के मिटर= ४ मनुष्य
१  एकर=१६१९२ मनुष्य
1 कि. मी=१६ *१६१९२=२५९०७२ मनुष्य. 
२) एका जागी थांबलेले. 
१ स्के मिटर =५  मनुष्य 
१ एकर = २०२४० मनुष्य
१ किमी = ३२३८४० मनुष्य.
DATE: 29-09-16: FROM MR GANESH A SONAWANE, KANDIVALI, MUMBAI:

*"मी OBC बोलतोय"*
*१९४६ साली
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
‘शुद्र पूर्वी कोण होते..?’.
हा ग्रंथ लिहिला.*
*या ग्रंथाच्या माध्यमातून
मनूच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील
चौथ्या व सर्वात खालच्या वर्णाचा
अर्थात शुद्रांचा (म्हणजे ओबिसींचा)
इतिहास त्यांनी प्रथमच उजेडात आणला.*
( वाचून तर पाहा म्हणजे सत्य समजेल )
*संविधान निर्मिती दरम्यान
शेतकऱ्यांचे एक मोठे नेते
डॉ. पंजाबराव देशमुख हे
बाबासाहेबांना भेटायला आले होते.* 
*त्यावेळी बाबासाहेबांनी
‘मी राज्यघटनेमध्ये ओबीसींसाठी
महत्वाची तरतूद करणार आहे,
ही कल्पना देशमुखांना दिली.*
*‘Who were the Shudras...?’
(शुद्र पूर्वी कोण होते...?)
हा ग्रंथ नुकताच
डॉ. बाबासाहेबांनी लिहून पूर्ण केला होता आणि 
संविधानाच्या कामाला हात घातला होता.*
*शुद्र समाजाच्या संदर्भात
संशोधन करून स्वतंत्र पुस्तक लिहिले असल्याने 
शूद्रांचा प्रश्न बाबासाहेबांना अत्यंत जिव्हाळ्याचा 
आणि महत्वाचा वाटत होता.* 
* प्रश्न सोडविण्यासाठी
संविधानात आवश्यक त्या तरतुदी
करता येऊ शकतील
असा विश्वास बाबासाहेबांना होता.*
*संविधान लिहित असतांना,
ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा आला
त्यावेळी बाबासाहेबांनी 'पहिल्यांदा'
ओबीसी समाजाचा विचार केला.*
*ओबीसी समाजासाठी ३४० वे,*
*अनुसूचित जातींसाठी ३४१ वे,* 
*अनुसूचित जमातींसाठी ३४२ वे
कलम तयार केले.*
*आणि* 
*ही सर्व कलमे
"घटना समिती" मध्ये
सविस्तर स्पष्टीकरण देऊन
मंजूर करवून घेतली.*
*यापैकी
अनुसूचित जातीच्या ३४१ व्या व
अनुसूचित जमातीच्या ३४२ व्या कलमाला
फारसा विरोध झाला नाही.*
*पण,
ओबीसींसाठी तयार केलेल्या ३४० कलमाला
मात्र प्रचंड विरोध झाला.* 
*ओबीसींसाठी
डॉ. बाबासाहेबांनी "स्वतंत्र कलम"
तयार केले आहे हे कळताच
महात्मा गांधी, पंडित नेहरू,
वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद
असे त्यावेळचे जवळजवळ सर्वच नेते
नाराज झाले.*
*‘कोण हे ओबीसी...?’'
असे वल्लभभाई पटेल
स्वतः OBC असूनही त्यांनी
तुसडेपणाने बाबासाहेबांना विचारले.*
*घटना समिती आणि
संसदेतील हिंदुधर्मीय सदस्यांनीच
या कलमाविरुद्ध आवाज उठवला.*
*परंतु,
या विरोधाला डॉ. बाबासाहेबांनी
त्यांच्या शिक्षण व अफाट माहितीच्या बळावर 
भिक घातली नाही.*
*त्यांनी ओबीसी कोण आहेत...?
आणि
ते मागास का राहिलेत...?
हे पटवून दिले आणि
त्यांच्यासाठी ३४० व्या कलमाची
तरतूद मंजुर केली.*
*अर्थात,
घटनेत कलम घातले असले तरी
या कलमाला असलेला उच्चवर्णीयांचा विरोध 
मावळला नाही तो नाहीच...!*
*घटनेतील या कलमानुसार
देशात ओबीसी जाती
नक्की किती व कोणत्या आहेत
हे तपशीलवार शोधून काढणे आणि
त्यांच्या मागासलेपणाचे कारण तपासून
त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
शिफारशी करणे यासाठी
आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली.* 
*२६ जानेवारी १९५० रोजी
संविधान लागू झाले.* 
*त्यानंतर लगेचच
बाबासाहेबांनी "ओबीसी आयोग "
स्थापन करण्याची
मागणी केली.*
*परंतु,
तत्कालीन ब्राह्मण पंतप्रधान पंडित नेहरूंनी
या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले.
टाळाटाळ केली.*
*त्याच वेळी
हिंदू कोड बिला संदर्भात
बाबासाहेब काम करत होते
आणि ते बिल लवकरात लवकर मंजूर करावे
असा आग्रह धरत होते.*
* ओबीसी व सर्व धर्मातील स्त्रियां
या दोन मोठ्या लोकसमुहाच्या प्रश्नासंबंधीच्या
बाबासाहेबांच्या मागणीला
काँग्रेसचे पुढारी
वाटाण्याच्या अक्षता लावत होते.* 
*ओबीसी समाजाकडे पाहण्याचा
सरकारचा "उपेक्षेचा दृष्टीकोन" तसेच
हिंदू कोड बिल संमत न करून
स्त्रियांच्या प्रश्नांबाबत दाखवलेली
"अक्षम्य उदासीनता" याचा निषेध म्हणून
अखेर "२७ सप्टेंबर १९५१" रोजी
बाबासाहेबांनी "कायदेमंत्रीपदा"चा
राजीनामा दिला.*
*या राजीनाम्याने
एकच हल्लकल्लोळ माजला.*
*सरकार हादरले.*
*डॉ. बाबासाहेब
आता गप्प बसणार नाहीत,
याची नेहरूंना चांगलीच कल्पना आली.* 
*कारण त्याच सुमारास
पंजाबराव देशमुख, आर. एल. चंदापुरी 
यांच्यासारखे अनेक ओबीसी नेते
डॉ. बाबासाहेबांच्या संपर्कात होते आणि
या प्रश्नावर देशभर रान उठवण्यासंबंधी
हालचाली करत होते.
याचाही सुगावा नेहरूंना लागला होता.*
*१९५२ साल उजाडले.* 
*पहिल्या सार्वत्रिक निवडणुका सुरु झाल्या.*
*डॉ. बाबासाहेबांनी
त्यांच्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात
प्रथमच ३४० व्या कलमानुसार
ओबीसींसाठी आयोग स्थापन करण्याचे
अभिवचन दिले.*
*देशभरातला ओबीसी समाज यामुळे
काँग्रेसपासून दूर जाऊ शकतो आणि
डॉ. बाबासाहेबांच्या पक्षाभोवती एकवटू शकतो
हे "चाणाक्ष नेहरूंच्या" लवकर लक्षात आले.*
*त्यांनी आयोगाचे आश्वासन द्यायला सुरुवात केली आणि अखेर २९ जानेवारी १९५३ ला 
दत्तात्रय बाळकृष्ण उर्फ काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला गेला.*
*कालेलकर हे कोकणस्थ ब्राह्मण होते आणि 
गांधीवादी होते.*
*ब्राह्मणी सोवळ्या ओवळ्यावर
त्यांचा जास्त भर असे.*
*आयोगाचे काम करतांना
त्यांना देशभर फिरावे लागले.
त्यावेळी त्यांना ब्राह्मण आचारी लागे.* 
*तशा सक्त सुचना
ते जिथे जिथे जायचे तिथल्या स्टाफला
आगाऊ करत असत.*
*३० मार्च १९५५ रोजी
कालेलकरांनी आपला अहवाल
राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद याना सादर केला.*
*अहवालाचा सारांश पाहिल्यावर
ब्राम्हण राष्ट्रपति राजेंद्रप्रसाद भडकले.*
*"स्वातंत्र्य मिळवलेय,
ते ह्या लोकांना मिठाई खिलवण्यासाठी काय ?"*
असा "कुत्सित शेरा राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद  
यांनी मारला आणि
पंडित नेहरूंना तात्काळ फोन करून
आपली नाराजी प्रकट केली.*
*नेहरूंनी अहवाल ताबडतोब मागवून 
शिफारशी वाचल्या....!*
*त्यांनाही त्या आवडल्या नाहीत.*
*लगेच नेहरूंनी
कालेलकारांना बोलावून फैलावर घेतले.*
*"तुम्ही अहवाल लिहिला हे ठीक आहे,
पण आता तो स्वीकारता येणार नाही,
अशी तरतूद करा"*
असे बजावले.
*दुसऱ्याच दिवशी म्हणजे
३१ मार्चला कालेलकरांनी ३१ पानी पत्र लिहून, 
"आपण आयोगाचे अध्यक्ष असलो तरी,
या आयोगाने केलेल्या शिफारशींशी
मी सहमत नाही", 
असे स्पष्ट शब्दात कळवले.*
*त्यामुळे
आयोगाची अंमलबजावणी तर सोडाच,
आयोगाचा अहवाल संसदेत मांडला जाणार नाही 
याची तजवीज झाली.*
*"आयोगाचे अध्यक्षच
या अहवालाशी सहमत नसल्यामुळे
हा अहवाल संसदीय पटलावर ठेवण्याची व
त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही"
असे संसदेत जाहीर करण्यात आले.*
*पुढे बरीच वर्षे हा अहवाल
विस्मरणात गेला होता.*
*कालांतराने
इंदिरा गांधी सत्तेवर आल्या.*
*१९७५ साली त्यांनी आणीबाणी लागू केली.*
*त्याविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जनता पक्ष स्थापन केला.*
*जनता पक्षाने १९७७ ची निवडणूक लढवली, 
या निवडणुकांना सामोरे जातांना
जनता पक्षाने
‘कालेलकर अहवालाची अमलबजावणी करू’
असे जनतेला आश्वासन दिले.*
*निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.*
*जनता पक्षाचे राज्य आले,
मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.*
*काही दिवसांनी
ओबीसींचे शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेले,
तर ते म्हणाले,
* "यह कालेलकर कमिशन पुराना हो गया है,
अब हम ऐसा करेंगे,
एक नया कमिशन बिठायेंगे... !"* 
*अशा तऱ्हेने
निवडणुकात दिलेल्या आश्वासनाचा भंग करून 
ओबीसींना धोका देण्यात आला.*
*१ जानेवारी १९७९ रोजी
बिंदेश्वर प्रसाद मंडल (B.P.MANDAL) या 
ओबीसी खासदाराच्या नेतृत्वाखाली
नव्या आयोगाची स्थापना झाली.* 
*३१ डिसेम्बर १९८० रोजी
मंडल आयोगाचा अहवाल
सरकारला सादर करण्यात आला.* 
*"देशातील
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या 
३,७४४ ओबीसी जाती शोधून काढण्यात आल्या."*
*महाराष्ट्रात ३६० जाती
ओबीसी असल्याचे निष्पन्न झाले.*
*या जातींच्या उन्नतीसाठी
मंडल आयोगाने अत्यंत महत्वपूर्ण अशा
शिफारशी केल्या.* 
*ओबीसींच्या आशा
पुन्हा एकदा पल्लवित झाल्या.* 
*परंतु १९८० ते १९९० या काळात
केंद्र शासनाने या शिफारशी
लागू करण्याबाबत जराही हालचाल केली नाही 
किंवा सहानुभूती दाखवली नाही.*
*अक्षरश: दहा वर्षे
मंडल आयोगाचा अहवाल
धूळ खात पडून राहिला.*
*याच दरम्यान देशभरातून
"मंडल आयोगाची अंमलबजावणी करा"
अशी मागणी होत होती.* 
*कांशीराम यांच्या संघटनेने
दिल्लीत व देशात विविध ठिकाणी
उपोषणे, आंदोलने केली.*
*महाराष्ट्रात
दलित पँथर तसेच रिपब्लिकन पक्षाने
मोर्चे काढले, धरणे धरली,
Adv. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले,
लक्ष्मण माने, Adv. एकनाथ साळवे,
हनुमंत उपरे, श्रावण देवरे, हरी नरके असे
असंख्य कार्यकर्ते या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले.*  
*एड. जनार्धन पाटील यांचा
मंडल आयोगाविषयीच्या प्रबोधनकार्यात
पुढाकार होता.* 
*फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या
प्रेरणेने काम करणाऱ्या संघटनांचा
मंडल आयोग जागृतीत सिंहाचा वाटा होता.* 
*अक्षरश:
शेकडो दलित लोक तुरुंगात गेले.*
*विशेष गंमत म्हणजे
काही अपवाद वगळता
ओबीसी समाजाला
मंडल आयोगाचा अहवाल
ओबीसींसाठी आहे
याचा थांगपत्ताच नव्हता.*
*ज्याअर्थी
आंबेडकरी विचारांचे नेते
मंडल आयोगाच्या आंदोलनात
हिरीरीने सहभागी झाले आहेत
त्याअर्थी
"मंडल आयोग दलितांसाठीच आहे"
असा बहुसंख्य ओबीसींचा
गैरसमज झाला होता.*
*अखेर ७ आगस्ट १९९० रोजी
तत्कालीन प्रधानमंत्री
विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 
मंडल आयोग लागू करण्याची
ऐतिहासिक घोषणा केली.*
*घोषणा झाल्याबरोबर
हिंदुत्वाचा पुकारा करणाऱ्या
विश्व हिंदू परिषद,
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,
बजरंगदल 
अनेक पक्ष संघटनांनी
देशभर हैदोस घालून
मंडल आयोगाला प्रचंड विरोध केला.*
*मोर्चे, धरणे, रास्ता रोको, रेल रोको
या गोष्टी तर त्यांनी केल्याच,
परंतु मोठ्या प्रमाणावर
हिंसक आंदोलने केली.*
*काही विद्यार्थ्यांनी तर
अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.* 
*देशात सगळीकडे वातावरण तंग बनले.*
*एव्हढे करूनही
व्ही. पी. सिंग यांनी
निर्णय बदलला नाही.*
*आपले सरकार
भाजपने बाहेरून दिलेल्या टेकूवर उभे आहे
हे ठाऊक असतांनाही
व्ही. पी. सिंग ठाम राहिले.*
*शेवटी
अडवाणींची रथयात्रा
लालूप्रसाद यादव यांनी
अडविल्याच्या कारणावरून
भाजपने पाठींबा काढून घेतला
आणि सरकार पाडले.*
*ओबीसींची बाजू घेणाऱ्या,
ओबीसींना थोडाफार का होईना
पण न्याय देवू करणाऱ्या
व्ही पी सिंह  सरकारला
हिंदुत्ववाद्यांनी (मनुवाद्यांनी) असा
जबर धक्का दिला.*
*ओबीसी हे कुणी
मुसलमान किंवा ख्रिश्चन नव्हते.
ते तर हिंदूच होते.
तरीही हिंदुत्ववादी/मनुवादी शक्तींना
ओबीसींबद्धल बिलकुल प्रेम नव्हते.* 
*कारण,
ओबीसी हे
आपल्या धर्मव्यवस्थेतील शुद्र लोक आहेत,
त्यांना उच्च शिक्षणाची, चांगल्या नोकर्‍या,
चांगल्या राहणीमानाची आवश्यकता नाही
ही हिंदूधर्माची धारणा
त्यांच्या मनात पक्की रुजलेली होती.*
*शूद्रांना (ओबीसींना)
हलके लेखण्याची
उच्चवर्णीयांची मानसिकता
मंडल आयोगाच्या निमित्ताने
पुन्हा एकदा अधोरेखित झाली.*
*मंडल आयोगाच्या माध्यमातून
हळूहळू का होईना
देशभरातला ओबीसी जागृत होत आहे
याचे अचूक भान संघपरिवाराला आले.* 
*ही "जागृती"
अशीच वाढत राहिली तर
बहुसंख्य असलेला (52% लोकसंख्या) हा समाज 
सत्ता, शिक्षण, संपत्ती, नोकरी, प्रतिष्ठा यातला 
आपला न्याय्य वाटा मागण्यासाठी
संघर्ष करायला सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही 
आणि मग समाज व्यवस्थेमधले
उच्चवर्णीयांचे उच्च स्थान अबाधित राखणे
अवघड होईल.
हे त्यांनी ओळखले."* 
*हे होऊ द्यायचे नसल्यास
एकच उपाय*
*– Diversion of  Attention !* 
*म्हणजे-
दिशाभूल करणे, लक्ष दुसरीकडे वळवणे..!* 
*मंडल आयोगाच्या चळवळीला
छेद द्यायचा असेल तर
एखादा पर्यायी मुद्दा
विशेषत: भावनिक / धार्मिक मुद्दा
पुढे आणून त्यात ओबीसींना गुंतवले पाहिजे
असा विचार संघपरिवारात होऊन
"राममंदिरा"चे आंदोलन सुरु झाले.*
*"आपण सारे हिंदू असून
मुसलमान आपले दुश्मन आहेत.
आपल्या देवाच्या
रामाच्या जन्मभूमीच्या जागी
आपल्या शत्रूची बाबरी मशीद आहे.
ती जागा ताब्यात घेवून
तिथे रामाचे मंदिर बांधणे
आपले धर्मकर्तव्य आहे"*
असा प्रचार त्यांनी सुरु केला. 
*अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे
ही मागणी घेवून संघपरिवार
पार खेड्यांपाड्यांपर्यंत गेला.*
*धार्मिक + भावनिक वातावरण
तयार करण्यात आले.*
*'राममंदिरा' साठी
गावागावातून हळद-कुंकू लावून
विटा गोळा करण्यात आल्या.*
*देशाचे वातावरण मंदिरमय करण्यासाठी
अडवाणींनी मुस्लिमांविरुद्ध
धार्मिक भावना भडकवणारी
रथयात्रा काढली.* 
*संपूर्ण भारतभर
धर्मधुंद नशा
पसरवण्यात आली.*
*'‘गर्व से कहो , हम हिंदू है’'
असा आक्रमक प्रचार करण्यात आला.*
*या धर्मिक + भावनिक प्रचाराला
इथला ओबीसी हां हां म्हणता बळी पडला.*
*त्या नादात ओबीसी त्याचा
मंडल आयोग पार विसरून गेला.*
*मंडल मंडल म्हणण्याऐवजी
ओबीसी
कमंडल ss कमंडल ss म्हणू लागला.* 
*_हिंदुत्ववाद्यांनी (मनुवाद्यांनी)
आपला डाव साधला._*
*"अरे,
ओबीसी आपलाच हिंदू बांधव आहे,
ओबीसी मागास राहिलेला आहे,
ओबीसीला आरक्षण दिले पाहिजे,
ओबीसीलाही
शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या
सशक्त केले पाहिजे"
असे या उच्चवर्णीयांना चुकुनही वाटत नाही.* 
*उलट,
ओबीसींनी मंडल कमिशन विसरावे यासाठी
त्यांना धर्माच्या नशेचे इंजेक्शन देण्यात आले
आणि
"तुम्ही कडवट हिंदू आहात"
या भाषेत त्यांना
हरभऱ्याच्या झाडावर चढवून 
मुस्लिमांविरुद्ध चिथावण्यात आले.*
*म्हणजेच ज्यावेळी
°ओबीसींच्या विकासाचा प्रश्न° येतो
त्यावेळी ओबीसी हे हिंदू असूनही शत्रू ठरतात,* 
*आणि,*
*इतर धर्मियांशी लढण्यासाठी मात्र
त्यांना ‘कट्टर हिंदू’ म्हणून पुढे केले जाते...!"*
*ओबीसीही मग
धर्माची राख डोक्यात घालून घेतात,
आणि फुकट मरतात.*
*धर्माची धुंदी इतकी असते की
आपले मित्र कोण..?
शत्रू कोण..?
आपले हित कशात आहे..?* 
*हे ओबीसींच्या लक्षातच येत नाही.*
*मंडल आयोगातील शिफारशी काय आहेत-* 
*ओबीसींना आरक्षण देण्यासंदर्भात
मंडल आयोगाने अनेक महत्वाच्या
शिफारशी केल्या आहेत.*
*या शिफारशी खालीलप्रमाणे –*
*१). शासकीय-निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, अनुदानित खाजगी संस्था शासनाचे सार्वजनिक उपक्रम व उद्योग
या सर्व ठिकाणी
ओबीसीसाठी २७ टक्के जागा
राखीव जागा ठेवाव्यात.*
*२). खुल्या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या
ओबीसी उमेदवारांचा समावेश
खुल्या गटात करण्यात यावा.*
*३). पदोन्नतीतही (Pramotion)
याच प्रकारचे आरक्षण द्यायला हवे.*
*४). नोकरीसाठी वयोमर्यादेची अट
शिथिल करावी.*
*५). ज्या भागात
इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या जास्त आहे,
तिथे प्रौढशिक्षण वर्ग सुरु करावेत.
(पालकांचे किमान शिक्षण असल्याशिवाय
मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असे
शैक्षणिक वातावरण निर्माण होत नाही..)*
*६). ओबीसी विद्यार्थ्यांसाठी
निवासी शाळा व वसतीगृहे काढावीत.*'
*७). ओबीसी विद्यार्थ्यांसाठी
इतरांच्या बरोबरीने येण्यास
शाळा महाविद्यालयात
विशेष मार्गदर्शन (कोचींग क्लास) सुरु करावे.*
*८). ओबीसी विद्यार्थ्यांसाठी
व्यवसायिक शिक्षण व तंत्र शिक्षणाची सोय.*
*९). ओबीसींना
उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी
अर्थपुरवठा करणाऱ्या
संस्थांची उभारणी करण्यात यावी.*
*१०). कमाल जमीन धारणा कायद्याने 
अतिरिक्त जमीन ओबीसींना वाटून द्यावी.*
*११). शिफारशींच्या
परिणामकारक अंमलबजावणीसाठी
सध्याच्या कायद्यात व नियमात
आवश्यक ते बदल करावेत.*
*या
व अशा अनेक शिफारशी
मंडल आयोगाने केल्या होत्या.
त्यापैकी,
फारच थोड्या शिफारशींची 
अंमलबजावणी होणार हे स्पष्ट होते.* 
*कारण,
सर्वच शिफारशींची अंमलबजावणी करण्यात 
सत्ताधारी वर्गाला,
मग तो कोणत्याही
प्रस्थापित पक्षाचा असो,
अजिबात उत्साह नव्हता.*
*"सर्व शिफारशी अंमलात आणल्या तर
क्रांती होऊन आपल्याच हितसंबंधावर
उद्या गदा येईल अशी भीती"
हे यामागील कारण असावे.*
*(याबाबत सत्ताधारी कायम Alert असतो.)*
*मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा
निर्णय झाल्याबरोबर
अहवालातील शिफारशींना आव्हान देत
इंदर सहानी आणि
अन्य तीस जण कोर्टात गेले.* 
*कोर्टात जाणारे हे सर्वजण
उच्चवर्णीयच होते !_*
हे कृपया नेहमीसाठी लक्षात ठेवावे.
*इंदर सहानी विरुद्ध केंद्र सरकार हा खटला 
त्यावेळी मंडल आयोगाचा खटला म्हणून
विशेष गाजला.*
*या केसचा निकाल
१६ नोव्हेंबर १९९२ रोजी लागला.*
* या निकालाने मंडल आयोगाचा
अक्षरश: ‘निकालच’ लावला.*
*अहवालाच्या अंमलबजावणीवर
इतके निर्बंध लावले की
मंडल आयोग
‘असून नसल्यासारखाच’
अशी त्याची गत झाली.*
या निकालाने,
*१). ओबीसी म्हणून
आरक्षण घेवू पाहणाऱ्यांना
‘क्रिमीलेअर’चा निकष लावला.*
*२). "एकूण आरक्षणा"ने
५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता कामा नये
ही अट घातली.*
*३). ओबीसींना
पदोन्नती आरक्षण नाकारले.*
*४). देशात
३,७४४ ओबीसी जाती असल्या तरी
प्रत्यक्षात त्यातल्या १,९८० जातींनाच
आरक्षण मिळेल
अशी अप्रत्यक्ष व्यवस्था केली गेली .*
*कोर्टाच्या निकालपत्रातील
वरील चारही आदेशांचा
ओबीसींच्या आरक्षणावर
दूरगामी आणि विपरीत परिणाम झाला.* 
*कोर्टाच्या निकालाद्वारे
मंडल आयोग "लुळा~पांगळा" करण्यात आला.*
*न्यायपालिके मध्येही
सर्व उच्चवर्णिय असल्यामुळे
त्यांना मंडल आयोग
निष्क्रिय करणे सोपे गेले...!*
*मंडल आयोगाच्या माध्यमातून
जागृत होत असलेला
ओबीसी वर्ग त्यामुळे संभ्रमित झाला.
चिडला.*
*असे होणार हे गृहीत धरून
चिडलेल्या ओबीसींचा राग
दुसरीकडे वळवण्यासाठी,
रागाचा निचरा करण्यासाठी
त्याच्यासमोर खोटा शत्रू मुसलमान
ऑलरेडी उभा करण्यात आला होताच.*
*आणि "राममंदिरा"चा
प्रश्नही तयार करून ठेवला होता,
तोही जास्तच पेटवण्यात आला.*
*या वातावरणाचे पर्यवसान
६ डिसेम्बर १९९२ या दिवशी
अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात झाले.*
*न्यायालयाने दिलेल्या
मंडलासंबधीच्या निकालानंतर
अवघ्या वीस (20) दिवसांनी
ही घटना घडली,
घडवून आणण्यात आली * 
*मशीद पडल्यानंतर
देशभर दंगली उसळल्या.*
त्यानंतर आजपर्यंत भारतात
दंगली, बॉम्बस्फोट, अशा प्रकारच्या
ज्या ज्या घटना घडल्या,
त्यातल्या जवळजवळ सर्व घटना
बाबरी मशिदीच्या पतनाच्याच
प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिक्रिया आहेत,
असे समाजशास्त्रज्ञांचे व
या विषयातील तज्ञांचे मत आहे.*
 *ज्यांनी
"व्हू वेअर दि शुद्राज"
हा ऐतिहासिक ग्रंथ लिहून
ओबीसींचे आत्मभान जागविले,
ओबीसींमध्ये चेतना निर्माण केली,
सर्वांचा विरोध होतअसतांना
संविधानात ३४० वे कलम घातले,
त्याद्वारे मंडल आयोगाला जन्म दिला
आणि
ओबीसींना त्यांचे
न्याय, हक्क व अधिकार मिळण्याचा
मार्ग खुला केला,
त्या परमपूज्य डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 
परिनिर्वाण दिनी
बाबरी मशिद पाडण्यात आली...!"*
*अशाप्रकारे
या मनूवाद्यांनी*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर
या महामानवाच्या,
ओबीसींच्या कल्याण व हितासाठी झटणाऱ्या 
खऱ्या देशभक्ताच्या निर्वाणदिनी
बाबरी मशिदिच्या विध्वंशाच्या निमित्ताने ओबीसींना खुशी साजरी करायला लावले....!*
*मनुवाद्यांचे केवढे मोठे हे  षडयंत्र....!*

*आमच्या ओबीसी बांधवांचे केवढे मोठे दुर्दैव....! 
*भारतातील बहुसंख्य असलेल्या
(संपूर्ण लोकसंख्येच्या 52% टक्के)
OBC समाज जो कोणत्याही क्षेत्रात KeyPost वर 
म्हणजे अधिकाराच्या/मोक्याच्या जागांवर
हमखास राहू शकतो...*
*राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री
व अश्या सर्वच क्षेत्रातल्या
मुख्य जागांवर येवून संपूर्ण देशाचा जो
"राजा" होवू शकतो,
त्याला आता
" गर्वसे कहो....." मध्ये अडकवून
पार भिकारी व हतबल करून सोडला आहे
या मनुवाद्यांनी....!*
करा
विचार करा.
पटल असेल तर
दुसर्‍या ओबीसी बांधवाला पाठवा.
त्यापूर्वी
घरच्यांसोबत वाचन करा.
पत्रके छापा.
समाजातील जागृत जागरूक व्यक्तींबरोबर विचारमंथन करावे.
वरच्या मजकुरात चुका असतील तर
दुरुस्त कराव्यात.
परंतू चर्चा अवश्य व्हावी.

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

DATE: 23-09-16: FROM MR SUNIL KAILAS KAMBLE, CHEMBUR, MUMBAI:

 वाचा. अनेकांचे गैरसमज दुर होतील.

🎯 *_अॅट्रोसीटी कायद्याचे काही कळते तरी काय ?_*                    

📋✍🏻 *अनिल वैद्य*
            *माजी न्यायाधीश*

👉 अॅट्रोसीटी कायदा रद्द करा, म्हणणाऱ्यांना कायदा तरी कळतो काय ? हा कायदा का केला हे ह्यांना माहीती तरी आहे काय ?
👉 संविधानाने  कलम १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट केली, ही तरतूद आहे. या तरतुदीचे पालन केले नाही तर उपाय योजना म्हणून हा कायदा केला.
👉 संविधानात कलम १५ ने जात, धर्म या आधारे सरकारला कुणाशी भेद करता येत नाही, कुणाला जाती, धर्माच्या कारणाने सार्वजनिक स्थळी, हॉटेल, विहीर, शाळा ईत्यादी स्थळी प्रवेश नाकारता येत नाही. अशी तरतूद केली आहे.
👉 या संविधानिक तरतुदीचा भंग केला तर त्याला शिक्षा म्हणून अॅट्रॉसीटी कायदा केला आहे.
👉 जो पर्यंत संविधानात कलम १७,  कलम १५ आहेत तो पर्यंत हा कायदा रद्द होऊ शकत नाही. या कायद्याचे मूळ संविधानात आह, हे तरी कळते काय ?
👉 आधी नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ ला आला. तो आजही लागु आहे. परंतु त्यातील तरतुदी अत्याचाराचा प्रतिबंध करण्यास पुरेशा नसल्याने अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ मध्ये करण्यात आला. तो ३०/१/1990 पासून लागु झाला.
👉 त्या नंतर तरी जातीय अत्याचारास प्रतिबंध झाला का ?
नाही ...
👉 त्या नंतरच नागपूरचे मनोरमा कांबळे हत्या प्रकरण घडले. आरोपी  निर्दोष सुटले.
👉 खैरलांजी प्रकरणात आरोपींना भा. द. वी. अंतर्गत शीक्षा झाली. परंतु अॅट्रोसीटी कायद्या मधून निर्दोष सोडलं.
👉 या कायद्याने आरोपीला शिक्षा जर होत नसेल, याचा अर्थ हाच की हा कायदा योग्य प्रकारे राबविल्या जात नाही.
👉 पोलीस स्टेशनला अॅट्रोसीटीची तक्रार, मोर्चा नेल्या शिवाय नोंदविली जात नाही. शिक्षा तर 3 टक्के ही नाही.
👉 विविध ऊच्च न्यायालायाचे असे काही निर्णय आहेत की आरोपीलाच फायदा होईल. आज पर्यंत या कायद्या अंतर्गत समित्या स्थापन केल्या नाहित, अनुसूचित जाती आयोगाने कधी कुणाला धारेवर धरले नाही, असे असतांना या कायद्याचा दुरुपयोग केला जातॊ अशी ओरड करणाऱ्यांना कायदा तरी कळतो काय ?
👉 मी यांना विचारतो, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग होत नाही काय ? कोणत्या कायद्याचा दुरुपयोग केला जात नाही ? जवळ जवळ सर्वच कायद्याचा दुरुपयोग केला जातो. भा. द. वी. चा सुध्दा लोक दुरुपयोग करतात. मग भा. द. वी. रद्द करणार काय ?

📋✒ *अनिल वैद्य, माजी न्यायाधीश*
       🔸 *_बुद्ध धम्म अनुसरण संघ ®_*🔸

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

DATE: 29-07-16: FROM MR GANESH A SONAVANE, KANDIVALI(W), MUMBAI:

 ⭕ 124  year old  ⭕
  ⭕ BIO - DATA ⭕
     
        (1891-1956)

B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D.,
 D.Litt., Barrister-at-La w.
 B.A.(Bombay University)
 Bachelor of Arts,
 MA.(Columbia university) Master
 Of Arts,
 M.Sc.( London School of
 Economics) Master
 Of Science,
 Ph.D. (Columbia University)
 Doctor of
 philosophy ,
 D.Sc.( London School of
 Economics) Doctor
 of Science ,
 L.L.D.(Columbia University)
 Doctor of
 Laws ,
 D.Litt.( Osmania University)
 Doctor of
 Literature,
 Barrister-at-La w (Gray's Inn,
 London) law
 qualification for a lawyer in
 royal court of
 England.
 Elementary Education, 1902
 Satara,
 Maharashtra
 Matriculation, 1907,
 Elphinstone High
 School, Bombay Persian etc.,
 Inter 1909,Elphinston e
 College,Bombay
 Persian and English
 B.A, 1912 Jan, Elphinstone
 College, Bombay,
 University of Bombay,
 Economics & Political
 Science
 M.A 2-6-1915 Faculty of Political
 Science,
 Columbia University, New York,
 Main-
 Economics
 Ancillaries-Soc iology, History
 Philosophy,
 Anthropology, Politics
 Ph.D 1917 Faculty of Political
 Science,
 Columbia University, New York,
 'The
 National Divident of India - A
 Historical and
 Analytical Study'
 M.Sc 1921 June London School
 of
 Economics, London 'Provincial
 Decentralizatio n of Imperial
 Finance in
 British India'
 Barrister-at- Law 30-9-1920
 Gray's Inn,
 London Law
 D.Sc 1923 Nov London School
 of
 Economics, London 'The
 Problem of the
 Rupee - Its origin and its
 solution' was
 accepted for the degree of D.Sc.
 (Economics).
 L.L.D (Honoris Causa) 5-6-1952
 Columbia
 University, New York For HIS
 achievements,
 Leadership and authoring the
 constitution of
 India
 D.Litt (Honoris Causa)
 12-1-1953 Osmania
 University, Hyderabad For HIS
 achievements,
 Leadership and writing the
 constitution of
 India!
Name
✅ Dr.  B. R. Ambedkar✅
Hai koi mai ka lal after him

इंग्लंड वरून भारतात डॉ.वेलबी चे एक कमिशन आले होते.या कमिशनने रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता. यासाठी जगभरातील अर्थ शास्त्रज्ञाना निमंत्रीत केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली,
शेवटचे मत डाॅ.बाबासाहेब मांडणार होते, इतक्यात डॉ.वेलबी बाबासाहेबांना म्हणाले, डॉ.आंबेडकर,मी जगातील प्रसिध्द विद्वान अर्थ शास्त्रज्ञांची मते
व संदर्भ ऐकली आहेत तेंव्हा आपले मत मला ऐकण्याची अवश्यकता आता वाटत नाही!
यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले, डॉ.वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिध्द अर्थ शास्त्रज्ञानी ज्या पुस्तकातील हे संदर्भ सांगितले त्या पुस्तकांचा मी लेखक आहे.
त्या पुस्तकांतील काही भाग लिहिणे अजुन बाकी आहे. तो मीच पुर्ण करू शकतो !
हे ऐकुन डॉ. वेलबी खाली उतरले बाबा साहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रूपायाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले.
जगाने त्यांच्या ज्ञानाला स्विकारले पण भारतात आजही त्यांचा फोटो पाहील्यावर कित्येक लोकांच्या कपाळावर आठ्या पडतात ही शोकांतिका आहे.!!
खरे भारतीय असाल तर फोर्वर्ड करा..
DATE: 22-09-16: FROM MR NAVAL R ADSUL, KHAR, MUMBAI:

माणुस मेल्यानंतर त्याच्या स्वर्गातल्या आत्म्याला शांती मिळावी
म्हणुन पिञ जेवु घालतात,

आता बघा हं...

ब्राम्हणाचा बाप ब्राम्हण....
मराठ्याचा बाप मराठा....
माळ्याचा बाप माळी.....
कोळ्याचा बाप कोळी....
महाराचा बाप महार....
मांगाचा बाप मांगच....

सगळेच वेगवेगळ्या जातीचे

तर मग माणुस मेल्यावर सगळ्यांचा बाप कावळाच का ????

कुणाचा राजहंस असावा, कुणाचा बगळा असावा, कुणाचा मोर तर कुणाचा बदक असावा....

जीवंतपणी माणसां माणसांत भेदभाव,
तर मेल्यावर समानता....असे का ?

कोणी रचला हा ढोंगीपणा...!!
                                          🔭
मी  "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"

मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द आहे का?"

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
 लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"

मी अब्दुल कलामांवर कविता लिहीली
 लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही मुस्लिम अहात का"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही............

वाट पाहतोय.......
“ती"माणसे  गेली कुठे 

माणसाने माणुस मारून
फ़क्त आणि फ़क्त 
जात जिवंत ठेवली आहे.
मात्र इथेही मनात प्रश्न उभा राहतो तो हा की , जी गोष्ट मनातून " जात " नाही ती " जात " की आणखीनच वेगळी कोणती ..🙏

सर्व पित्री आमवश्या येई पर्यन्त  सगळ्यांचा संबोधन व् प्रबोधनाचा हिस्सा होउयात .... त्या ऐवजी एखाद्या गरीब मुलाला अन्न देऊया ,पुस्तक देऊया, त्याच्या प्रगतिचा हिस्सा होण्याचा छोटासा प्रयत्न करुया .......
 अन्नाचा (काल्पनिक धुर )वर पोहचुन आत्म्यांना खुश करण्या पेक्षा  जिवंत असणाऱ्या आत्म्याला वैज्ञानिक प्रगतिची मशाल पेटउन देऊया...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

DATE: 21-09-16: FROM MR ASHOK P SANKPAL, MATUNGA, MUMBAI:

Pay only Rs1/- perday (Ruppe one only)
Like never before, The Modi government has started a new scheme exclusively for Indian Army Battle Casualties and Weapon Purchase.
The government has opened bank account where people can donate funds directly to Army Welfare Account which will be used for purchasing weapons to the Indian Army and providing facilities for war casualties.
People had suggested Government to open bank account to collect funds exclusively for battle casualties and purchasing weapons for army, the Modi government has accepted the suggestion and opened an account in Syndicate Bank, New Delhi for the same. The most attractive feature of this scheme is, people can donate the smallest amount of ONE RUPEES.Master Stroke by Modi Government
A country’s population of 130 crore of which even 100 crore people (70%) deposit One Rupee Each, the ministry will get 100 crores/day, 3000 crores/month and 36000 crores/year.
36,000 Crore which is greater than Pakistan’s total defence expenditure.
We spend hundreds and thousands of rupees on many unnecessary expenditure, but if we can spend ONE RUPEE on army, it can surely make India a SUPER POWER.
The money will directly reach the defence ministry for army benefit and war casualties.This is the most unique idea to help our army Jawans who have lost life in battle fields.
Come together, show solidarity to our DEFENCE FORCES, PARA MILITARY FORCE and CRPF.
JOIN THE MISSION TO MAKE INDIA A SUPER POWER!
Bank Details:
SYNDICATE BANK
A/C NAME: ARMY WELFARE FUND BATTLE CASUALTIES
A/C NO: 90552010165915
IFSC CODE: SYNB0009055
SOUTH EXTENSION BRANCH,NEW DELHI.
==
please circulate to maximum members
DATE: 21-09-16: FROM MR NAVNATH A KOKANE, ANDHERI, MUMBAI:

१ मिनिट वेळ असेल तर एकदा वाचाच

किशोर ढवळे

रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे.

तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली. डोक्यावरचे केसपूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जूनं गोणपाट होतं. त्यावरच बसलेली असायची.

थंडी पासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी. एवढंच. 

एवढं असूनही चेह-यावर कायम स्मितहास्य असायचं.

एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं, "बाळ, नाव काय तुझं...?"

मी  नाव  बोललो 

कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. काय?

मी पुन्हा बोललो 

त्या हसत हसत बोलल्या "अच्छा . छान आहे नाव" 

त्यांनी मग इतर चौकशी केली. म्हणजे घरी कोण असतं? गाव कोणतं? नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं, "डब्या मध्ये काही शिल्लक आहे का?" मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, "नाही ओ आजी". का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं, नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, "काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहीलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा" 

हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची पण मजबूरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करवून घेतं. मी हो बोललो आणि निघालो.

घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं. तिला पण खूपवाईट वाटलं. दुस-या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "आता गेल्या गेल्या दे म्हणजे आताच ताजं खाऊन घेतील" 

मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेह-यावर वेगळाच आनंदं होता. त्यांच्या चेह-यावरील आनंदं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.

दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं. 

संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जावून पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं.

मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, "आजी काय करताय हे ?"

त्या हसल्या आणि बोलल्या...बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली.

कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती.

त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला.

कदाचित हेच जीवन होतं. दुस-यासाठी थोडसं सुख घेवून जाणे.

जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहीलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब साठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला. अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या "आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू... मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू "

मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, या जगात आशिर्वाद आणि आनंदं मिळवण खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की, त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशिर्वाद मिळून जातात.

पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो.

मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता पर्मनंट झाला होता. म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती.

मी जवळच्या टपरीवर गेलो
आणि विचारलं, "इथल्या आजी कुठे आहेत ?" त्याने मला पाहिलं आणि बोलला, "अरे वारल्या त्या. 2 महीने होवून गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं.

मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्या साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.

अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं  की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली. त्या  कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला !!!

*आपल्यातलं थोडसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन*

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

DATE: 20-09-16: FROM MR RAM MANOHAR VHATKAR, DHARAVI, MUMBAI:

एक सैनिक ने क्या खूब कहा है...

किसी गजरे की खुशबु को महकता छोड़ आया हूँ, मेरी नन्ही सी चिड़िया को चहकता छोड़ आया हूँ, मुझे छाती से अपनी तू लगा लेना ऐ भारत माँ, मैं अपनी माँ की बाहों को तरसता छोड़ आया हूँ,,,,,,,

शहीदो को शत शत नमन  👏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 सुप्रभात

DATE: 20-09-16: FROM DR RAJEEV S VHATKAR, KOLHAPUR:

🔆⭕🔆  _*अनुभवाचे  बोल*_  🔆⭕🔆

👉 ज्यांनी तुम्हाला *दुखावले* आहे त्यांचेही आभार माना कारण तुम्ही मानसिकदृष्टय़ा *अधिक बळकट* व्हावे, यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे.

👉तुम्हाला ज्यांनी *फसवले* त्यांच्या विषयी देखिल कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला *शहाणपण* शिकवले आहे.

👉ज्यांनी तुम्हाला *नकार* दिला त्यांनाही धन्यवाद द्या कारण त्यामुळे *लढण्यासाठी* चेतवले गेलात.

👉ज्यांनी तुम्हाला *सोडून* दिले त्यांच्या विषयी चांगली भावना ठेवा कारण त्यांनी तुम्हाला *स्वावलंबी* बनण्याची प्रेरणा दिली

👉जे तुमच्यावर *टीका* करतात त्यांची गुण ग्राहकता लक्षात घ्या. तुमच्यावर टीका करून ते तुमच्या *व्यक्तीमत्वात सुधारणा* करण्यासाठीच सहाय्य करत असतात.

👉तुमचे *पाय मागे* खेचणाराचे आभार माना कारण, ते तुमच्या *पायात बळ* निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात.

👉तुम्हाला *कमी लेखणाऱ्यांचे* कौतुक करा. कारण ते तुम्हाला तुमच्यातील *कमतरता* किंवा *त्रुटी* दाखवून देत असतात.

       _*तुम्हाला ताकद देणाऱ्यां विषयी सदैव*_
       _*कृतज्ञ रहा.  धन्यवाद  !!!*_
DATE: 20-09-16: FROM DR RAJEEV S VHATKAR, KOLHAPUR:

🔆⭕🔆  _*अनुभवाचे  बोल*_  🔆⭕🔆

👉 ज्यांनी तुम्हाला *दुखावले* आहे त्यांचेही आभार माना कारण तुम्ही मानसिकदृष्टय़ा *अधिक बळकट* व्हावे, यासाठी त्यांचा हातभार लागलेला आहे.

👉तुम्हाला ज्यांनी *फसवले* त्यांच्या विषयी देखिल कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला *शहाणपण* शिकवले आहे.

👉ज्यांनी तुम्हाला *नकार* दिला त्यांनाही धन्यवाद द्या कारण त्यामुळे *लढण्यासाठी* चेतवले गेलात.

👉ज्यांनी तुम्हाला *सोडून* दिले त्यांच्या विषयी चांगली भावना ठेवा कारण त्यांनी तुम्हाला *स्वावलंबी* बनण्याची प्रेरणा दिली

👉जे तुमच्यावर *टीका* करतात त्यांची गुण ग्राहकता लक्षात घ्या. तुमच्यावर टीका करून ते तुमच्या *व्यक्तीमत्वात सुधारणा* करण्यासाठीच सहाय्य करत असतात.

👉तुमचे *पाय मागे* खेचणाराचे आभार माना कारण, ते तुमच्या *पायात बळ* निर्माण करण्याची प्रेरणा देत असतात.

👉तुम्हाला *कमी लेखणाऱ्यांचे* कौतुक करा. कारण ते तुम्हाला तुमच्यातील *कमतरता* किंवा *त्रुटी* दाखवून देत असतात.

       _*तुम्हाला ताकद देणाऱ्यां विषयी सदैव*_
       _*कृतज्ञ रहा.  धन्यवाद  !!!*_

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

DATE: 19-09-16: FROM MR YASHWANTRAO S MORE, MUMBAI:

*मराठा .... सत्य*                                             १९४८ ला गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीत बहुतेक ब्राम्हण जमीन जायदाद सोडून गावातून पळून गेले आणि शहरात स्थाईक झाले. त्यानंतर गावाची सगळीच्या सगळी सत्ता मराठ्यांच्या हातात आली. गावाचे चालक मालक कर्ते धर्ते तेच बनले. बलुतेदारांना पोटावारी घरगड्यासारखे राबवून घेतले. नुसत्या बांधावर बसून दोन-दोनसे तीन-तीनसे एकर शेती पिकून घेतली. तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत पाटिलकी गाजवली. चार चार बायका करून आणखी वरून रांडा ठेवल्या. फेट्यासोबत उडवून उरलेल्या नोटा कोर्ट कचेर्यात उडवल्या. नोटा आटू लागल्यावर पुन्हा एकरा एकराने शेती फुकली. गुरं विकले, ढोरं विकले. शेवटी वाड्याची मातीही विकली. आता विकायला काहीच उरलं नाही म्हणून यांना आरक्षण पाहिजे? 

ग्रामपंचायती, पंचायत समित्या, झेडप्या यांच्या ताब्यात. आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदं, मुख्यमंत्रीपदं यांच्या ताब्यात. सुतगिरण्या, साखरकारखाने, दुधडेर्या यांच्या ताब्यात. सोसायट्या, सहकारी बॅंका, शिक्षण संस्था यांच्या ताब्यात. तरी यांच्यावर अन्याय झाला म्हणे! कुणी केला हा अन्याय? गावकुसाबाहेर राहणार्या दलितांनी? जंगलात राहणार्या आदिवासींनी? बिर्हाड पाठीवर घेवून गावोगावी भटकणार्या भटक्यांनी? दिवसभर गाड्यावर काही वाही विकून पोट भरणार्या मुसलमानांनी? सांगा  मराठ्यांनो तुमच्यापैकी किती जन गावा बाहेर पालं ठोकून राहतात? किती जनांना बूड टेकायला जमीन नाही? किती जन फुटपाथावर झोपतात? किती जन झोपडपट्टीत  राहतात? किती जन नगर पालिकेच्या गटारी उपसतात? रेल्वे रुळावरची घान साफ करतात? किती बायका रस्ते झाडतात? किती जन सुलभ शौचालयं चालवतात? किती जन डोक्यावरून मैला वाहतात? यांचं आरक्षण तुमच्या डोळ्यात खुपते ना? मग घ्या आरक्षण आणि करा ना ही कामं ! आम्हीही आरक्षण सोडायला तयार आहोत. फक्त जमीनीचं आणि संपत्तीचं एकदा समान पूनर्वाटप करा. आहे हिंम्मत? 

तुम्हाला ॲट्रोसिटीचाही  भयंकर त्रास होतो म्हणे! मग संपवून टाका ना जातीयता. गावकुसाबाहेरच्यांना गावात घ्या. महारा मांगाला पोरी द्या. भिला, भंग्याच्या पोरी घ्या. पारध्या, कातकर्याला शेजार द्या. कोणाही दलितावर बहिष्कार टाकू नका.जातीवरून हिनवू नका, शिवीगाळ करू नका.  आम्ही स्वत: हून  ॲट्रोसिटी रद्द करण्याची मागणी करू. आम्हाला काय जातीची हौस नाही. 

आमच्या बाया तुम्ही वाड्यावर बोलावल्या, शेरपसा धान्याच्या बदल्यात वाटेल तेंव्हा भोगल्या. कोरभर भाकरीची लालूच दाखवून रक्त आटेस्तोवर कामं करून घेतली. मजुरीला बोलावून शेतावाडीत गाठून देहाचे लचके तोडले. एखादीनं विरोध केला तर सार्या गावा देखत नग्न धिंडी काढल्या. त्या सर्व आमच्या आया बहिणी होत्या. तेंव्हा आम्हाला काहीच वाटलं नसेल? आणि आज पहिल्यांदा कोण्यातरी पशुने तुमच्या पोरीवर बलात्कार केला म्हणून तुम्ही पेटून उठलात. आरोपीला भरचौकात फासी द्या, दलित म्हणून समर्थन करणाराच्या तोंडात गू घाला. आमचं काहीच म्हणनं नाही. पण यासाठी सगळ्या दलितांना वेठीस धरण्याचे कारण नाही. लाखोंचे मोर्चे काढून वचक बसवण्याचा, ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू नका.

आमचा आणि ब्राम्हणाचा संबंध १४ ऑक्टोबर १९५६ पासूनच संपला. ते आमच्या दारात येत नाहीत आणि आम्ही त्यांच्या दारात जात नाही. आमचं शोषण ब्राम्हणांनी नाही, तुम्ही केलं. आमच्यावर जातीय अत्याचार ब्राम्हणांनी नाही, तुम्ही केलेत. खैरलांजी, सोनई, खेर्डा, शिर्डी तुम्ही घडवलं ब्राम्हणांनी नाही. आमच्यावर बहिष्कार तुम्ही टाकला,आम्हाला  गावबंदी तुम्ही केली आणि बोट मात्र ब्राम्हणाकडे दाखवता. नुस्त्या ब्राम्हणांना शिव्या देवून पुरोगामी बनता येत नसते  मराठ्यांनो! त्यासाठी आपल्याच जातीतील जातीयवाद्यांविरोधात उभे रहावे लागते. राहताल उभे? आहे हिंम्मत? जाती साठी माती खाणारे लाख भेटतील, पण अखील माणसासाठी मातीत उतरणारा एखादाच शिवाजी, शाहू, सयाजी, भाऊराव, कॉ. शरद् पाटील, आ. ह. साळूंखे, मा. मो. देशमुख असतो आणि तो लाखाच्या बरोबरीचा असतो यांनाच म्हणतात एक मराठा लाख मराठा!                                              *विजय तारा नामदेव*
DATE: 19-09-16: FROM MR ANIL RAMCHANDRA SONAWANE, BORIVALI, MUMBAI:

सर्व बांधवाना नम्र विनंती आहे की, आपल्या मुला-मुलीनां खुप शिकवा. शक्यतो मराठी व इंग्रजी शिक्षण द्या. देवधर्मावर खर्च करणे सोडा. संगणक घ्या. मुला-मुलीनां सरपंच, चेरमन, अध्यक्ष करण्यापेक्षा कलेक्टर, डाॅक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक, लेखक, अधिकारी, सचिव, पंतप्रधान, राष्ट्रपती, न्यायधीश करा.
          ब्राम्हण निर्मिती ग्रंथ, देव, व्रत, यज्ञ, सत्यनारायण, अभिषेक, नागबली, शांती, शनि, पिंडदान, मृतीप्रतिष्ठा, पुजापाठ सोडुन द्या. देवघरा ऐवजी संगणक घर करा. देवा धर्मा साठी लढायचे-मरायचे सोडुन द्या, कारण मंदीर बांधुन ब्राम्हणाचा प्रश्न सुटतो. आपला सुटत नाही.
DATE: 19-09-16: FROM MR KARAN GUNAJI SONKAWADE, BORIVALI, MUMBAI:

📚: प्रा.हरी नरके सरांचा लेख 👇👇
आरक्षण :-  आर्थिक की जातीनिहाय ?

गेले काही दिवस आरक्षणाचा पाया हा जात, जमात किंवा सामाजिक आणि शैक्षणिक हा न ठेवता आर्थिक आधारावर समाजातील सर्व गरिबांना आरक्षण द्यावे ही भुमिका आग्रहाने मांडणारांची संख्या वाढते आहे.

आपल्यापैकी ज्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे वाटते त्यांच्यासमोर याबाबतची काही तथ्ये मांडणे गरजेचे झालेले आहे.

 २५ सप्टेंबर १९९१ रोजी नरसिंहराव सरकारने आर्थिक आधारावर दहा टक्के आरक्षण दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधिशांच्या घटनापिठाने ते घटनाविरोधी ठरवले व रद्द केले हे आपणास माहित आहे काय?

पुन्हा असे आर्थिक आधारावर आरक्षण दिले तर ते न्यायालयात टिकणार नाही. त्यासाठी घटनादुरूस्तीही केली तरी ती संविधानाच्या मुळ चौकटीला बाधा आणणारी असल्याने न्यायालयात संमत होणार नाही.

सर्वच समाजातील गरिबांना न्याय मिळायला हवा त्यासाठी मदत म्हणून भरपूर सरकारी योजना असतात. वेगळ्या रंगाच रेशनकार्ड असतं, अनुदाने (subsidies) असतात.आर्थिकदृष्ट्या मागासांना सरकारकडुन EBC सवलत मिळते. 

 संविधानाच्या कलम ३८ आणि ४६ मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. "बीपीएल" अर्थात दारिद्र्य रेषेखालील सर्व गरिबांना सरकारने शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा, असे संरक्षण द्यायलाच हवे. पण ते देण्याचा / मागण्याचा मार्ग आरक्षण हा नाही. या गोष्टी न मागता त्यांना आरक्षण द्या असे म्हणणे म्हणजे "आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असली गत होईल.

आरक्षण हा गरीबी हटाव प्रोग्राम, रेशन धान्य वाटप किंवा एलपीजी सब्सिड़ी नाही तो सामाजिक न्यायाचा कार्यक्रम आहे हे आरक्षणविरोधकांच्या ध्यानात येत नाही.

चातुर्वर्णाच्या पायावर रुजलेल्या, हजारो जातींनी दुभंगलेल्या देशातली गरीबी ही केवळ देशाच्या आर्थिक स्थितीचा परिपाक नसून सामाजिक धार्मिक इतिहासाचा परिपाक आहे हे कटु वास्तव आहे. 

आकडेवारी काढ़ायचीच झाली तर चतुर्थ श्रेणी कामगार, सफाई कामगार, मैला उचलून नेणारे, भूमिहीन शेतमजूर ह्यांची जात कोणती ते पाहावे, 

आरक्षणाच्या अजुनसुद्धा नोकऱ्यांमधील कधीही न भरला जाणारा मागासवर्गीय जागांचा अनुशेष पाहावा, आणि जात आजकाल कोणी मानत नाही म्हणणाऱ्यांनी दलित हत्याकांडाची भीषणता पाहावी.

 हजारो वर्षे ज्या व्यवस्थेने खालच्या जातीतले म्हणून लोकांना शिक्षण नाकारले, रोजगाराच्या नव्या संधीपासून वंचित ठेवले, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या तटबंदीतून जातीय स्तरामुळे आर्थिक विकासाच्या संधी नाकारल्या, त्या व्यवस्थेच्या दयनीय आजारावर जातीवर आधारित आरक्षण हाच एकमेव उपाय आहे. 

आर्थिक तत्वावर आरक्षण ही संकल्पनाच् मुळात हास्यास्पद आहे. उद्या विजय मल्ल्या किंवा सुब्रतो राय पूर्ण भिकेला लागले,

 जागतिक मंदी येऊन त्याच्या धडाक्यात महिना लाखभर पगार घेणारे लाखो इंजीनियर घर नोकरी गमावून बसले, शेयर बाजाराच्या बैलाने लाखो गुंतवणूकदारांना शिंगावर घेतले,

 आज कौन बनेगा करोड़पती मध्ये पाच करोड़ जिंकलेला उद्या लासवेगास मध्ये माती खाऊन आला, अंगावर पचास तोला मिरवणारा भाई सोने चोरीला जाऊन भनंग झाला,

 ह्या सगळ्यांना आर्थिक तत्वावर आरक्षण मिळेल काय?? मुळात कोणता व्यक्ती केव्हा कसा गरीब होतो, कसा श्रीमंत होतो ह्याचा इत्यंभूत अद्ययावत ट्रैक रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे काय? 

बीपीएल कार्डाचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. ज्या सवर्णांचे आर्थिक उत्पन्न जास्त आहे ते देखील कमी उत्पन्नाचे दाखले सादर करुन EBC सवलती मिळवतात.

चिरिमिरी देऊन व्यवस्थेशी साट़लोट करून बीपीएल कार्ड मिळवणे, हव्या त्या उत्पन्नाचे हवे तितके दाखले मिळवणे हे व्यवस्था दावणीला बांधणाऱ्यांना, 

उच्च सामाजिक स्तरातल्या गबरगंडाना काहीच अशक्य नाही. तेव्हा आर्थिक आधारावर आरक्षण हे किती धोकादायक असू शकते ह्याचा विचार करावा.

आज देशातील आयकर कायदे धाब्यावर बसवून सुमारे ३५ कोटी लोक आयकर बुडवतात. 

अवघे ५ कोटी २९ लाख लोक आयकर देतात. लक्षात ठेवा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर हे आयकर भरणारे ५ कोटी २९ लाख वगळता उरलेल्या १२३ कोटींची आरक्षण घेण्यासाठी रांग लागेल आणि अशा रांगेत खर्‍या गरजू, होतकरू आणि वंचितांना जागाच मिळणार नाही.

सरसकट आर्थिक तत्वावर आरक्षण हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहे.

 ज्या समाजघटकांना शिक्षण, शासकीय पदे आणि लोकपालिकेत प्रतिनिधीत्व डावलले गेलेले आहे त्यांना ते प्रतिनिधित्व विशेष संधीद्वारे देण्याचा हा कार्यक्रम आहे.

बहुसंख्य दलित गरिब आहेत हे खरे आहे. पण ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं नाही. सामाजिक गरजेतून दिलेलं आहे.

गरिबांना न्याय मिळवा यासाठी आरक्षण हा उपाय नाही.

भारतीय संविधानातील आरक्षण ही तरतूद व्यक्तिकेंद्रित नसून सामाजिक प्रतिनिधित्वाची व सामाजिक न्यायाची तरतूद आहे. 

कोणत्या विकसित देशात आरक्षण आहे का? अशी बालिश विचारणा आरक्षणविरोधक मंडळी करतात. त्याच वेळेस ते हे सोईस्कर पणे विसरतात की जगातल्या कोणत्याच विकसित देशात भारताइतकीच भयान जातीय उतरंड नाही!

 अफ्रीकन अमेरिकन, हिस्पेयिन अमेरिकन, अश्वेत ह्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची तरतूद अमेरिकेच्या ॲफर्मेटिव्ह अॅक्शन पॉलिसी मध्ये आहे. कॅनडा,जपान, चीन सारख्या देशातही अल्पसंख्याक समूह, ऐतिहासिक सामाजिक बहिष्कृत समजले जाणारे लोकसमूह ह्यांच्यासाठी विविध पॉलिसीजची तरतूद आहे.
जातीचे सदस्यत्व जन्माने मिळते. 

उत्पन्न दरवर्षी बदलू शकते. जात मात्र कधीही बदलता येत नाही.

जातीवरून दलित,आदिवासी आणि ओबीसींना काही शतके जर डावलले गेले असेल तर जातीच्या आधारेच हा पक्षपात दूर करावा लागेल. 

काट्याने काटा काढणे, ही न्यायाची रिती येथे वापरलेली आहे. असे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत ५०% पेक्षा जास्त असता कामा नये असे डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासभेला बजावले होते [ संविधान सभा वृत्तांत, खंड सातवा, पृ. ७४१-४२]

आरक्षण घेऊन जर एखादी व्यक्ती आर्थिकदृष्टया सक्षम झाली असली तरी सामाजिकदृष्टया ती व्यक्ति अस्पृश्य म्हणूनच पाहिली जाते ती स्पृश्य होत नाही.

हि वस्तुस्थिती आरक्षण विरोधक लक्षात घेत नाही.

दलित , आदिवासी हा कितीही शिकला तरी तथाकथित सवर्ण हा या लोकांना कधीही जवळ तर करत नाहीच परंतु त्याला अस्पृश्यच समजले जाते , त्याला समाजात चांगली प्रतिष्ठाही मिळत नाही , त्यामुळे संविधानात सांगितलेल्या समता आणि बंधुता या तत्वांचे पालन योग्यरित्या होत नाही . आदिवासी,दलित मुलगा डॉक्टर होणे आणि सवर्ण  मुलगा डॉक्टर होणे यातही बराचसा फरक असतो.

आदिवासी मुलगा डॉक्टर झाला तरी त्याला समाजात स्विकारले जातेच असे नाही परंतु त्याच सवर्ण  डॉक्टरला या समस्येला कधीही सामोरे जावे लागत नाही . 

आदिवासी किंवा मागासवर्गीय 
शासकीय नोकर असला तरी त्याला त्याच्या जाती वरूनच ओळखले जाते. तुझा पैसा तुझ्या घरात, जात तीच ना असही म्हटले जाते.

 बाप IAS असला तरी पोराला जातीवरून मुली नाकारतात , लग्न जुळवताना ,
वधू/वर- 96 कुळी मराठा/ब्राह्मण/वैश्य, 25, 5'6", सुंदर/देखणा, MBA, मासिक प्राप्ती- 80,000/-, परदेशी जाण्याची तयारी

अपेक्षा- सुंदर/देखणा, उच्चशिक्षित, मासिक प्राप्ती- मुलीस/मुलास साजेशी, परदेशी जाण्याची तयारी. जातीची अट नाही (SC/ST क्षमस्व)

अशा जाहिराती पहिल्याच असतील?

जेव्हा अपेक्षित निकष पूर्ण करणाऱ्या, सक्षम मागास तरुण/तरुणीला नि:संदेहपणे स्विकारण्याची, 'जातीची कोणतीही अट अजिबात नाही. SC/ST Most welcome अशी मानसिकता रुजल्याचं अशा जाहिरातीमधूनही दिसू लागेल, तेव्हा अशा सक्षम SC/ST चं मागासलेपण दूर झालंय की नाही याचा विचार करता येईल. 

सरकारी नोकरीतही अनेक वेळा दलित ,आदिवासींना मुद्दाम त्रास दिला जातो.

आजही सरकारी नोकरीच्या परीक्षांमध्ये अनेकवेळा जात पाहून मार्क दिले जातात.

लिखित परीक्षेत चांगले मार्क मिळूनही साक्षात्कारामध्ये( इंटरव्युमध्ये ) बाहेर काढून टाकले जाते आणि आरक्षण असूनही त्या आरक्षित जागा भरल्या जातचं नाहीत.

 सरकारी नोकरीतही बदली किंवा बढतीसाठी अनेकदा केवळ जात पाहुनच त्रास दिला जातो . या प्रकारचा त्रास हा अन्य वर्गाला कधीही भोगावा लागत नाही .

घटना परिषदेत आरक्षण देताना सामाजिकच निकष का लावायचे आणि आर्थिक निकष का लावायचा नाही यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. [पाहा : संविधान सभा वृत्तांत, खंड, १ ते १२, ईंग्रजी/हिंदी, लोकसभा सचिवालय प्रकाशन, भारत सरकार.]

आपल्या भारतीय समाजात जात, लिंगभाव, वर्ग ही तीन पक्षपाताची आणि शोषणाची केंद्रे आहेत. त्यावर समग्र उपाययोजना करायची असेल तर ती केवळ आर्थिक आधारावर विसंबून करता येणार नाही.

आजच्या तीन प्रकारच्या राखीव जागांचा सम्यक विचार केला तर त्यातली राजकीय (पॉलिटीकल) प्रतिनिधित्व देणार्‍या {ग्रामपंचायत ते संसदेतील आरक्षण ]
 आरक्षणाला घटनेने कलम ३३४ द्वारे  दहा वर्षांची मुदत दिलेली आहे.ती वाढवित नेत आत्ता ती सत्तर वर्षे म्हणजे २०२० पर्यंत केलेली आहे.

मात्र घटनेत शिक्षण आणि नोकर्‍यातील आरक्षणाला ही मुदत लागू केलेली नाही. याचा अर्थ हे आरक्षण कायमस्वरूपी आहे काय? तर नाही. ते तात्पुरतेच आहे. मात्र ते कधी संपेल तर ज्या दिवशी या सामाजिक घटकांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळेल त्या दिवशी आरक्षण संपेल. 

याचा अर्थ देशात जितक्या लवकर आपण सामाजिक न्याय प्रस्थापित करू तितक्या लवकर आरक्षण संपेल.

आज आपण पालकांचे उत्पन्न विचारात घेतो म्हणून अतिश्रीमंतांच्या मुलांमुलींना शासकीय लाभ मिळत नाहीत. मात्र उद्या आर्थिक आधारावर आरक्षण दिले आणि अंबानी, अडाणी, टाटा, बिर्ला, प्रेमजी, मुर्ती आदींच्या मुलांनी जर उत्पन्न पालकांचे आहे. आम्ही शिकतोय.आम्हाला स्वत:चे उत्पन्न कुठेय असे विचारले तर त्यांनाही या राखीव जागा द्याव्या लागतील.

ज्यांचा पिढ्या छान छौकीत गेल्या ज्यांचा ऐक दिवसही गोर -गरीब लोकांना हिणवल्या शिवाय जात नाही 
जे स्वतःला श्रेष्ठ समजण्यात जराही कसूर करत नाहीत अशा लोकांना आरक्षणाचं महत्व समजावून सांगणे अवघड आहे.

पिढ़ीजात श्रीमंती ही शोषणातून निर्माण झाली आहे,त्यामुळे ज्याचे शोषण झालं त्यांना आज समान स्तरावर आणणे ही शोषक वर्गाची जबाबदारी आहे.

म्हणुनच आरक्षणाचा पाया हा आर्थिक नसुन सामाजिकच आहे.

जोपर्यंत स्वातंत्र्य , समता , बंधुत्व आणि न्याय हे तत्वे समाजात रुजत नाही तोपर्यंत आरक्षण कायम राहणे गरजेचे आहे.

खाजगीकरणाद्वारे आरक्षण संपतेच आहे.गेल्या काही वर्षात अनेक सरकारी संस्थेचे खाजगीकरण झाले आहे.सैन्यात आरक्षण नाहीच आहे.

 अवघी पंधरा ते वीस वर्षे थांबा. कल्याणकारी राज्य मोडीत काढून पोलीस व सैन्य वगळता बाकी सारी सरकारी खाती खाजगीकरणात जातील.

- प्राध्यापक हरि नरके सर...
DATE: 19-09-16: FROM MR KARAN GUNAJI SONKAWADE, BORIVALI, MUMBAI:

सध्या सर्वांनाचं खुप सलणारा एक ज्वलंत प्रश्न गाजतोय तो म्हणजे,

"ऍट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्यात यावा!!"

म्हणे या कायद्याचा मोठ्या गैरवापर केला जातोयं..

म्हणे या कायद्यान्वये नोंदवले गेलेले ८०% गुन्हे खोटे आहेत..

म्हणे एक विशीष्ट समाज(महार) या कायद्याची ढाल करतो अन्  ब्लॅकमेलिंग करतो..

👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽
या सर्व बाजू ज्या ऍट्रॉसिटीला विरोध करणाऱ्यांनी मांडल्या आहेत. 

आता जरा हे सर्व काळजीपुर्वक वाचा
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

              "ऍट्रॉसिटी ऍक्ट"

१. या कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यासाठी दोन सक्षम साक्षीदार हवे असतात जे मागासवर्गीय अथवा आदिवासी नसावेत,

२. या गुन्ह्यांतर्गत तक्रार देणाऱ्याची व त्याच्याबाजूने साक्ष देणाऱ्यांची साक्ष/जबाब या सर्व इनकॅमेरा घेतल्या जातात,

३. या गुन्ह्यांतर्गत तपासी अधिकारी वरिष्ठ दर्जाचा हवा,

४. या गुन्ह्याची तक्रार देणारास तो मागेल तेव्हा पोलिस संरक्षण द्यावे लागते,

५. गुन्हा सिध्द झाल्यास गुन्हेगाराला कमीतकमी ५वर्षे तसेचं जास्तीत जास्त आजन्म सश्रम कारावासाची किंवा जर खुपचं गंभीर कृत्य असेल तर फाशीसुध्दा होऊ शकते.

मग आता मला सांगा गावच्या पाटलांच्या विरोधात म्हारा-मांगाच्या बाजूनं इतर समाजाचा कोणताही व्यक्ती साक्ष देण्यास तयारचं होत नाही भले गुन्हा घडतांना त्याने पाहीलं असेल तरीही..

मग सांगा इथचं झाली की नाही तक्रारचं फेल..

आणि अशाप्रकारे जर तक्रारचं फेल गेली तर मग तक्रारदार बोगस आहे अशी आवई हेचं लोक उठवतात..

बरं जरी तक्रार नोंदवली गेली तरी तिची शाहनिशा पारदर्शक पध्दतीने होतचं नाही

कारण तपासी अधिकारी एकतर यांच्याचं समाजाचा असतो नाहीतर मागासवर्गीय किंवा आदिवासी सोडून इतर कुठल्यातरी समाजाचा असतो 

मग सांगा इथं महारचं मांगाला खालचं लेखतो तर इतर समाजाचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोण कसा काय चांगला असेल.??

मग काय तो तपासी अधिकारी भलीमोठी लाच घेऊन सक्षम असलेली तक्रार एकदम पंगू करुन टाकतो..

अशाप्रकारे खरी असलेली तक्रार जर खोटी ठरवली जात असेल तर मग का नाही ८०% गुन्हे बोगस सिध्द होणार.??

आणखी एक सत्य
म्हणे हे लोक या कायद्याची ढाल करतात..

आता तुम्ही मला सांगा

गावची सोसायटी यांच्याच ताब्यात

गावची ग्रामपंचायत यांच्याच ताब्यात

तालूक्याची पंचायत समिती यांच्याच ताब्यात

तालूक्याचा शेतकीसंघ/दूधसंघ यांच्याच ताब्यात

तालूक्याची मार्केट कमिटी यांच्याच ताब्यात

तालूक्याचा आमदार यांचाच

सर्व जि.प. सदस्य यांचेच

जि.प. अध्यक्ष/ उपाध्यक्ष यांचेच

जिल्ह्यातील खासदार यांचेच

जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेच

मंत्रिमंडळात मंत्री यांचेच

मग राजकारणाचा किडा कुणाला जास्त आहे जरा तुम्हीचं सांगा मला 

"यांनाच..!!"

मग याचं राजकिय कुरघोडीतून एक मराठा नेता दुसऱ्या मराठा नेत्यास शह देण्यासाठी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याकरवी त्याच्यावर ऍट्रॉसिटी टाकतो..
मग समोरचाही काही कच्च्या गुरुचा चेला नसतो तो पण याच्याविरोधात त्याच्या निष्ठावान कार्यकर्त्याकरवी ऍट्रॉसिटीचाचं गुन्हा नोंदवतो..

मग सांगा बोगस ऍट्रॉसिटीला कोण कारणीभूत आहे.???

हेचं लोक.!!

आणि या कायद्याला विरोध करणारेही हेचं लोक.!!!

दुसरी एक गोष्ट

म्हणे यांना आरक्षण आहे म्हणून यांना कमी मार्क असले तरीही ऍडमिशन मिळते/ नोकरी लागते..

आता तुम्ही मला सांगा
मुळात आरक्षणाचा क्रायटेरीआ हा

४९.०५%     :     ५०.०५%

असा आहे..

म्हणजे आरक्षित वर्गाला १००पैकी ४९.५%जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ५०.५% जागा.!!!

या ४९.५% मधे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जाति आहेत ६७४६ इतक्या

आणि खुल्या प्रवर्गात ५०.५% आरक्षणासाठी "मोजक्याचं जाती आहेत" यातील एक जात म्हणजे मराठा.!!!

पण हे लोक काय करतात

शेतीच्या मेन कामांच्या वेळेस टाळ कुटत पंढरपूरला तंगडत जातात
आणि नुकसान करुन घेतात कारण योग्यवेळी पेरलंच नाही तर मग नंतर काय उगवणार "घंटा"

गावची जत्रा आली की गावच्या देवळाची रंगरंगोटी, पूजाअर्चा, मानाचं अध्यक्षपद हे चढ्याभावाने बोली लावून मिळवतात त्यातचं यांना लई भूषण वाटतं..

मग जत्रा म्हणलं की "बारी" आलीचं आणि बारी म्हणलं की "बाई" आलीचं..

मग काय पे दारु अन् उडीव नोटा..

झालं मग कट्टर हिंदुत्व पाळणाऱ्या यांना संक्रात आहेच, होळी आहेच, पाडवा आहेचं, श्रावण आहेच, गणपती/नवरात्र आहेचं त्यातुन कुठं सवड मिळते न् मिळते तोचं दिवाळी आलीचं..

वर्षभरातले सारे सण करता करता खिसा तर रिकामा होणारचं ना..

आणि हिंदू मुसलमान दंगलीत हेचं सर्वात पुढं मग सर्वात जास्त गुन्हे याचं समाजावर दाखल होऊन सर्वात जास्त यांचेच तरुण बेरोजगार होतात..

बाम्हण यांना हिंदू मुसलमान दंगलीच्या नादी लावतो आणि खुल्या प्रवर्गातून यांचा पत्ता करुन यांच्या वाटेच्या जागा बळकावतो..
कोणी विचारले तर हेचं उत्तर देतो/ शिकवतो की, त्या म्हारा-मांगांना लई सवलती हायती.. सरकारचे जावई बनून फिरतेत रांडंचे..

मग काय मराठ्यांच्या डोसक्यात फीट की, 
मुसलमानानंतर आपले नंबर १चे शत्रू हेचं..

बरं जे चुकेनमाकुन नोकरी धंद्याला आहेत ते आपली मुलं चांगल्या मोठ्या शाळा/कॉलेजांनी शिकवतात, होस्टेलला ठेवतात, भरगच्च फी भरतात वर आमच्या नावे गळा काढतात..

आता तुम्ही मला सांगा सगळ्या शिक्षणसंस्था कुणाच्या.??

यांच्याचं.!!!

मग यांना भरगच्च फी च्या नावाने लुटून खाणारे कोण.???

त्यांचेच जातभाई.!!!

तरीही बोंब आमच्याचं नावाची...

बरं नोकऱ्या नाही.. नोकऱ्या नाही.. आरक्षणवाले पटकन चिटकतात असं बोंबलणाऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की,
सगळया शिक्षणसंस्था यांच्याच,
सगळे साखर कारखाने यांचेच,
सगळ्या बँकात चेअरमन यांचेच,
सगळे ठेकेदार यांचेच,
सारे बागायतदार हेचं,
सारे मंत्रीसंत्री यांचेच..

मग जातभाई म्हणून
का नाही मराठा शिक्षणसम्राट त्यांना फि मध्ये सवलत देत नाही.??

का नाही मराठा साखरसम्राट/बँकांचे ताबेदार यांना कारखान्यात/बँकेत नोकरी नाही देत.??

का आमदार/खासदार, मंत्री/संत्री असणारे यांचे जातभाई यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विधानसभेत/लोकसभेत आवाज उठवत नाही.??

याचं कारण असं आहे की,

हे जर कारखान्यात लागले तर कारखान्यासाठी लागणारा ऊस कोण पिकवंण.??

हे जर आरक्षणाच्या जोरावर नोकरीला लागले तर मग आगे बढो.!! च्या घोषणा देत नेत्यांमागे कोण हिंडंण.??

हा यांचे नेते एक करतात यांना वाळूवाला, हॉटेलवर विनापरवाना दारुविक्री करणारा, अवैध धंद्यावाला होण्यास पाठबळ देतात जेणेकरुन हे त्यांच्या ताटखालचं मांजर होतील आणि जी साहेब.. व्हयं साहेब करत मागंपुढं हिंडतील.!!!!

आणि मागासवर्गीय समाजातील आपसातील गोष्ट काही निराळी नाहीए.!!!

आपणही आता सुधारलं पाहीजे..
अवैध धंदे सोडून उच्चशिक्षण घेऊन मोठं झालं पाहीजे..

एकमेकांच्या समाजाबद्दल एकात्मता वाढवली पाहीजे..

आपण बाबासाहेबांनी शिकवलेल्या शिकवणूकीच्या विरुध्द वागू लागलो तर असे प्रसंग उद्भवणारचं हे त्रिकाल सत्य आहे.!!!!

आपला बाप आपल्याला सांगून गेलायं..
"जा आणि तुमच्या घरांच्या भिंतींवर लिहून ठेवा की, आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय.!!!"

नुसतं तोंडाने जयभीम जयभीम म्हणनाऱ्यांनो..
"बाबासाहेबांना नुसतचं डोक्यावर घेण्यापेक्षा जरा थोडसं डोक्यातं घ्या.!!!!"

त्यांची शिकवण जपा तुम्ही आपोआप मोठे व्हालं.!!!!

आणि हो काही ठाराविक लोकांमुळे सबंध मराठा समाजाचा दु:स्वास करण्याची घोडचूक करु नका..

कारण,
चळवळीच्या माध्यमातून मराठा(ओबीसी) व बौध्द(एससी-एसटी) समाज एकत्र येत आहेत आणि ही एकजूट संघासाठी(RSS) भविष्यात घातक ठरेल हे अचुक हेरुन कोपर्डी प्रकरणाच्या आडून आपल्या भावा-भावात भांडण लावून संघाला या देशात विषमता आणि जातियवाद कायम जीवंत ठेवायचा आहे हे उघड सत्य आहे पण आपल्यातील व त्यांच्यातील काहींना वेळीचं समजलं तर खुप बरं होईल..

असो,
बाबासाहेबांना स्कॉलरशिप देणारे
छत्रपती शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराज हे देखील मराठा होते हे विसरू नका..

काहीतरी अघटित घडून बसण्या आधीचं वेळेची चाहूल ओळखून पावलं टाकायला शिका म्हणजे बरं होईल...

जय जिजाऊ..
जय ज्योति..
जय भीम...!!!

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

DATE: 17-09-16: FROM MR YASHWANTRAO S MORE, MUMBAI :

एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले...

" पाणी छान आणि थंड आहे.
आपल्या घरात फ्रिज नाही,
कुठुन आणलेस..?"

पत्नीः-
 "शेजारच्या कुंभारा कडुन.!"

ब्राम्हण ः-   काय..?

त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस, तुला लाज वाटत नाही...? आपण ब्राम्हण आहोत...
आपल्याला शुद्राचे
काही चालत नाही..?"

पत्नीः- (घाबरली व म्हणाली)
" मला माफ करा,
या पुढे अशी चुक
होणार नाही....

[दुस-या दिवशी.]

ब्राम्हण ः- 
"अग...
 जेवायला वाढ..!"

पत्नीः 
"काही-नाही..!"

ब्राम्हण ः- 
"काय...?
पोळी केली नाही..?"

पत्नीः-
" नाही....!
 कारण...
तवा व चुल शुद्र लोहाराने 
व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू
 फेकून दिल्या..!"

ब्राम्हण ः- "वेडी आहेस काय..?
बरं दुध आण..!"

पत्नीः- 
"मी दुध फेकुन दिले
 कारण....
 ते शुद्र गवळ्याने दिले.

 मी म्हटले 
'उद्या पासुन दुध आणू नकाे'
आम्हांला शुद्रांचे
काही चालत नाही..!"

ब्राम्हण ः (किंचाळला)
" काय...?"
ब्राम्हण :- "बरंबर" ...
झोपायला खाट लाव..!"

पत्नी म्हणाली ः-
"मी खाट तोडून टाकली
 व लाकडे जाळुन टाकली.
मेलं शुद्राचं काहीच नको
आपल्याला..!!"

ब्राम्हणाने डोक्याला हात लावला
म्हणाला :- "अरे...
ईथली धान्याची पोती
 कुंठ आहेत..?''

पत्नीः- 
"मी धान्य लोकांना वाटून टाकले कारण....
ते आपण कुणबी शुद्रां कडुन
घेतले होते.
नकोच ते आपल्याला ..!"

ब्राम्हणाला भाेवळ आली
 व म्हणाला,
" माझे आई...
 घरात काहीच दिसत नाही.
वस्तू कुठं गेल्या..?"

पत्नी म्हणाली :-
"नाथ...
 घरातली प्रत्येक वस्तू कुण्यातरी 
शुद्रांनेच बनवली आहे.
त्यामुळे...
मी त्या तोडुन मोडुन 
जाळुन टाकल्या..!"

ब्राम्हण मोठयाने ओरडला
 म्हणाला,
" अरे आपण
 पार भिकारी झालो...
 एवढे घरंच काय ते
 उरले आता...!"

पत्नी म्हणाली,
" नाथ...
चिंता करू नका,
 मी आपल्या आज्ञे पुढे नाही,
 मी हे घर दान करून टाकले आहे. 
कारण... हे घर त्या शुद्र गवंडी वडार व शुद्र मजुरांनी बांधले होते,
नकोच बाई आपल्याला शुद्राचे."
 "नाथ....
 चला आपण जंगलात जावू
 कारण...
इथे सर्व शुद्र आहेत,

भिक्षा काय शुद्राला मागायची..?
 नको नको..!"

ब्राम्हण चक्कर येवुन 
खाली पडला,
"हे देवा...
मी तर पार शुद्रापेक्षा
अतिशुद्र आहे.
माझ्याकडे कांहीच नाही,
मीच खरा शुद्र आहे,
माझे पानही शुद्रा शिवाय
हालत नाही...
देवा...
खरे उच्च शेतकरी 
सर्व अठरा पगडं जातीच महान
 व वंदनीय आहेत, मी मात्र  काहीच कामाचा नाही..!"

 मग त्या ब्राम्हणाने संपुर्ण समाजाची खाली डोके टेकुन
 माफी मागीतली
 व पत्नीच्या चरणावर 
 लोटांगण घालुन
 तीची...
 कान उघडल्यामुळे
 आभार मानले..!
👇
👇
👇
👉🏿लक्षात ठेवा
जगात कुणीही 
'श्रेष्ठ'  वा  'नीच' नाही,  सर्व समान व एकमेकांस पुरक आहेत..
मेसेज आवडला तर नक्की शेअर करा.........................................✍✍✍✍✍✍✍✍✍