सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

DATE: 19-09-16: FROM MR KARAN GUNAJI SONKAWADE, BORIVALI, MUMBAI:

सध्या सर्वांनाचं खुप सलणारा एक ज्वलंत प्रश्न गाजतोय तो म्हणजे,

"ऍट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्यात यावा!!"

म्हणे या कायद्याचा मोठ्या गैरवापर केला जातोयं..

म्हणे या कायद्यान्वये नोंदवले गेलेले ८०% गुन्हे खोटे आहेत..

म्हणे एक विशीष्ट समाज(महार) या कायद्याची ढाल करतो अन्  ब्लॅकमेलिंग करतो..

👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽
या सर्व बाजू ज्या ऍट्रॉसिटीला विरोध करणाऱ्यांनी मांडल्या आहेत. 

आता जरा हे सर्व काळजीपुर्वक वाचा
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

              "ऍट्रॉसिटी ऍक्ट"

१. या कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यासाठी दोन सक्षम साक्षीदार हवे असतात जे मागासवर्गीय अथवा आदिवासी नसावेत,

२. या गुन्ह्यांतर्गत तक्रार देणाऱ्याची व त्याच्याबाजूने साक्ष देणाऱ्यांची साक्ष/जबाब या सर्व इनकॅमेरा घेतल्या जातात,

३. या गुन्ह्यांतर्गत तपासी अधिकारी वरिष्ठ दर्जाचा हवा,

४. या गुन्ह्याची तक्रार देणारास तो मागेल तेव्हा पोलिस संरक्षण द्यावे लागते,

५. गुन्हा सिध्द झाल्यास गुन्हेगाराला कमीतकमी ५वर्षे तसेचं जास्तीत जास्त आजन्म सश्रम कारावासाची किंवा जर खुपचं गंभीर कृत्य असेल तर फाशीसुध्दा होऊ शकते.

मग आता मला सांगा गावच्या पाटलांच्या विरोधात म्हारा-मांगाच्या बाजूनं इतर समाजाचा कोणताही व्यक्ती साक्ष देण्यास तयारचं होत नाही भले गुन्हा घडतांना त्याने पाहीलं असेल तरीही..

मग सांगा इथचं झाली की नाही तक्रारचं फेल..

आणि अशाप्रकारे जर तक्रारचं फेल गेली तर मग तक्रारदार बोगस आहे अशी आवई हेचं लोक उठवतात..

बरं जरी तक्रार नोंदवली गेली तरी तिची शाहनिशा पारदर्शक पध्दतीने होतचं नाही

कारण तपासी अधिकारी एकतर यांच्याचं समाजाचा असतो नाहीतर मागासवर्गीय किंवा आदिवासी सोडून इतर कुठल्यातरी समाजाचा असतो 

मग सांगा इथं महारचं मांगाला खालचं लेखतो तर इतर समाजाचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोण कसा काय चांगला असेल.??

मग काय तो तपासी अधिकारी भलीमोठी लाच घेऊन सक्षम असलेली तक्रार एकदम पंगू करुन टाकतो..

अशाप्रकारे खरी असलेली तक्रार जर खोटी ठरवली जात असेल तर मग का नाही ८०% गुन्हे बोगस सिध्द होणार.??

आणखी एक सत्य
म्हणे हे लोक या कायद्याची ढाल करतात..

आता तुम्ही मला सांगा

गावची सोसायटी यांच्याच ताब्यात

गावची ग्रामपंचायत यांच्याच ताब्यात

तालूक्याची पंचायत समिती यांच्याच ताब्यात

तालूक्याचा शेतकीसंघ/दूधसंघ यांच्याच ताब्यात

तालूक्याची मार्केट कमिटी यांच्याच ताब्यात

तालूक्याचा आमदार यांचाच

सर्व जि.प. सदस्य यांचेच

जि.प. अध्यक्ष/ उपाध्यक्ष यांचेच

जिल्ह्यातील खासदार यांचेच

जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेच

मंत्रिमंडळात मंत्री यांचेच

मग राजकारणाचा किडा कुणाला जास्त आहे जरा तुम्हीचं सांगा मला 

"यांनाच..!!"

मग याचं राजकिय कुरघोडीतून एक मराठा नेता दुसऱ्या मराठा नेत्यास शह देण्यासाठी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्याकरवी त्याच्यावर ऍट्रॉसिटी टाकतो..
मग समोरचाही काही कच्च्या गुरुचा चेला नसतो तो पण याच्याविरोधात त्याच्या निष्ठावान कार्यकर्त्याकरवी ऍट्रॉसिटीचाचं गुन्हा नोंदवतो..

मग सांगा बोगस ऍट्रॉसिटीला कोण कारणीभूत आहे.???

हेचं लोक.!!

आणि या कायद्याला विरोध करणारेही हेचं लोक.!!!

दुसरी एक गोष्ट

म्हणे यांना आरक्षण आहे म्हणून यांना कमी मार्क असले तरीही ऍडमिशन मिळते/ नोकरी लागते..

आता तुम्ही मला सांगा
मुळात आरक्षणाचा क्रायटेरीआ हा

४९.०५%     :     ५०.०५%

असा आहे..

म्हणजे आरक्षित वर्गाला १००पैकी ४९.५%जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ५०.५% जागा.!!!

या ४९.५% मधे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जाति आहेत ६७४६ इतक्या

आणि खुल्या प्रवर्गात ५०.५% आरक्षणासाठी "मोजक्याचं जाती आहेत" यातील एक जात म्हणजे मराठा.!!!

पण हे लोक काय करतात

शेतीच्या मेन कामांच्या वेळेस टाळ कुटत पंढरपूरला तंगडत जातात
आणि नुकसान करुन घेतात कारण योग्यवेळी पेरलंच नाही तर मग नंतर काय उगवणार "घंटा"

गावची जत्रा आली की गावच्या देवळाची रंगरंगोटी, पूजाअर्चा, मानाचं अध्यक्षपद हे चढ्याभावाने बोली लावून मिळवतात त्यातचं यांना लई भूषण वाटतं..

मग जत्रा म्हणलं की "बारी" आलीचं आणि बारी म्हणलं की "बाई" आलीचं..

मग काय पे दारु अन् उडीव नोटा..

झालं मग कट्टर हिंदुत्व पाळणाऱ्या यांना संक्रात आहेच, होळी आहेच, पाडवा आहेचं, श्रावण आहेच, गणपती/नवरात्र आहेचं त्यातुन कुठं सवड मिळते न् मिळते तोचं दिवाळी आलीचं..

वर्षभरातले सारे सण करता करता खिसा तर रिकामा होणारचं ना..

आणि हिंदू मुसलमान दंगलीत हेचं सर्वात पुढं मग सर्वात जास्त गुन्हे याचं समाजावर दाखल होऊन सर्वात जास्त यांचेच तरुण बेरोजगार होतात..

बाम्हण यांना हिंदू मुसलमान दंगलीच्या नादी लावतो आणि खुल्या प्रवर्गातून यांचा पत्ता करुन यांच्या वाटेच्या जागा बळकावतो..
कोणी विचारले तर हेचं उत्तर देतो/ शिकवतो की, त्या म्हारा-मांगांना लई सवलती हायती.. सरकारचे जावई बनून फिरतेत रांडंचे..

मग काय मराठ्यांच्या डोसक्यात फीट की, 
मुसलमानानंतर आपले नंबर १चे शत्रू हेचं..

बरं जे चुकेनमाकुन नोकरी धंद्याला आहेत ते आपली मुलं चांगल्या मोठ्या शाळा/कॉलेजांनी शिकवतात, होस्टेलला ठेवतात, भरगच्च फी भरतात वर आमच्या नावे गळा काढतात..

आता तुम्ही मला सांगा सगळ्या शिक्षणसंस्था कुणाच्या.??

यांच्याचं.!!!

मग यांना भरगच्च फी च्या नावाने लुटून खाणारे कोण.???

त्यांचेच जातभाई.!!!

तरीही बोंब आमच्याचं नावाची...

बरं नोकऱ्या नाही.. नोकऱ्या नाही.. आरक्षणवाले पटकन चिटकतात असं बोंबलणाऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की,
सगळया शिक्षणसंस्था यांच्याच,
सगळे साखर कारखाने यांचेच,
सगळ्या बँकात चेअरमन यांचेच,
सगळे ठेकेदार यांचेच,
सारे बागायतदार हेचं,
सारे मंत्रीसंत्री यांचेच..

मग जातभाई म्हणून
का नाही मराठा शिक्षणसम्राट त्यांना फि मध्ये सवलत देत नाही.??

का नाही मराठा साखरसम्राट/बँकांचे ताबेदार यांना कारखान्यात/बँकेत नोकरी नाही देत.??

का आमदार/खासदार, मंत्री/संत्री असणारे यांचे जातभाई यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विधानसभेत/लोकसभेत आवाज उठवत नाही.??

याचं कारण असं आहे की,

हे जर कारखान्यात लागले तर कारखान्यासाठी लागणारा ऊस कोण पिकवंण.??

हे जर आरक्षणाच्या जोरावर नोकरीला लागले तर मग आगे बढो.!! च्या घोषणा देत नेत्यांमागे कोण हिंडंण.??

हा यांचे नेते एक करतात यांना वाळूवाला, हॉटेलवर विनापरवाना दारुविक्री करणारा, अवैध धंद्यावाला होण्यास पाठबळ देतात जेणेकरुन हे त्यांच्या ताटखालचं मांजर होतील आणि जी साहेब.. व्हयं साहेब करत मागंपुढं हिंडतील.!!!!

आणि मागासवर्गीय समाजातील आपसातील गोष्ट काही निराळी नाहीए.!!!

आपणही आता सुधारलं पाहीजे..
अवैध धंदे सोडून उच्चशिक्षण घेऊन मोठं झालं पाहीजे..

एकमेकांच्या समाजाबद्दल एकात्मता वाढवली पाहीजे..

आपण बाबासाहेबांनी शिकवलेल्या शिकवणूकीच्या विरुध्द वागू लागलो तर असे प्रसंग उद्भवणारचं हे त्रिकाल सत्य आहे.!!!!

आपला बाप आपल्याला सांगून गेलायं..
"जा आणि तुमच्या घरांच्या भिंतींवर लिहून ठेवा की, आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय.!!!"

नुसतं तोंडाने जयभीम जयभीम म्हणनाऱ्यांनो..
"बाबासाहेबांना नुसतचं डोक्यावर घेण्यापेक्षा जरा थोडसं डोक्यातं घ्या.!!!!"

त्यांची शिकवण जपा तुम्ही आपोआप मोठे व्हालं.!!!!

आणि हो काही ठाराविक लोकांमुळे सबंध मराठा समाजाचा दु:स्वास करण्याची घोडचूक करु नका..

कारण,
चळवळीच्या माध्यमातून मराठा(ओबीसी) व बौध्द(एससी-एसटी) समाज एकत्र येत आहेत आणि ही एकजूट संघासाठी(RSS) भविष्यात घातक ठरेल हे अचुक हेरुन कोपर्डी प्रकरणाच्या आडून आपल्या भावा-भावात भांडण लावून संघाला या देशात विषमता आणि जातियवाद कायम जीवंत ठेवायचा आहे हे उघड सत्य आहे पण आपल्यातील व त्यांच्यातील काहींना वेळीचं समजलं तर खुप बरं होईल..

असो,
बाबासाहेबांना स्कॉलरशिप देणारे
छत्रपती शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराज हे देखील मराठा होते हे विसरू नका..

काहीतरी अघटित घडून बसण्या आधीचं वेळेची चाहूल ओळखून पावलं टाकायला शिका म्हणजे बरं होईल...

जय जिजाऊ..
जय ज्योति..
जय भीम...!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा